शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासात आमदारांना परत आणतो, पण उद्धव ठाकरेंनी..." रामदास कदमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 10:33 IST

Ramdas Kadam : काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

दापोली : भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, ज्यावेळी शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यावेळी काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. आम्हाला महायुती टिकवायची आहे. गद्दारांची व्याख्या अनेकांना कळली नाही. उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. गद्दारांना सोबत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं रामदास कदम म्हणाले.

याचबरोबर, ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, हे शंभर टक्के खरं आहे. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. सगळ्या आमदारांना दोन तासात 'मातोश्री'वर नाही आणलं, तर माझं नाव रामदास कदम नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी माझं ऐकलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याशिवाय, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही यावेळी रामदास कदम यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मात्र, या दापोलीत कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. त्यावेळी चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. तर, यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाणांनीही कदमांना अडाणी असं संबोधलं होतं. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv Senaशिवसेना