शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

"काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासात आमदारांना परत आणतो, पण उद्धव ठाकरेंनी..." रामदास कदमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 10:33 IST

Ramdas Kadam : काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

दापोली : भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, ज्यावेळी शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यावेळी काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. आम्हाला महायुती टिकवायची आहे. गद्दारांची व्याख्या अनेकांना कळली नाही. उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. गद्दारांना सोबत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं रामदास कदम म्हणाले.

याचबरोबर, ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, हे शंभर टक्के खरं आहे. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. सगळ्या आमदारांना दोन तासात 'मातोश्री'वर नाही आणलं, तर माझं नाव रामदास कदम नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी माझं ऐकलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याशिवाय, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही यावेळी रामदास कदम यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मात्र, या दापोलीत कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. त्यावेळी चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. तर, यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाणांनीही कदमांना अडाणी असं संबोधलं होतं. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv Senaशिवसेना