शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासात आमदारांना परत आणतो, पण उद्धव ठाकरेंनी..." रामदास कदमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 10:33 IST

Ramdas Kadam : काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

दापोली : भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, ज्यावेळी शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यावेळी काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला.  

शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. आम्हाला महायुती टिकवायची आहे. गद्दारांची व्याख्या अनेकांना कळली नाही. उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कुणी चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. गद्दारांना सोबत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं रामदास कदम म्हणाले.

याचबरोबर, ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, हे शंभर टक्के खरं आहे. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. सगळ्या आमदारांना दोन तासात 'मातोश्री'वर नाही आणलं, तर माझं नाव रामदास कदम नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी माझं ऐकलं नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. याशिवाय, शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही यावेळी रामदास कदम यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. मात्र, या दापोलीत कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. त्यावेळी चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. मुंबई-गोवा महामार्गाचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. तर, यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाणांनीही कदमांना अडाणी असं संबोधलं होतं. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv Senaशिवसेना