शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

किमान वाजपेयींचे तरी स्मारक पूर्ण करा - मुंडे यांचा सरकारला टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:46 IST

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.

मुंबई -  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता माजी पंतप्रधान अटलविहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. किमान वाजपेयींचे स्मारक तरी पूर्ण होणार का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात करताना मुंडे यांनी सरकारवर टीका केली. दोन वर्षांत दीड लाख रिक्त पदे भरण्याची घोषणा झाली. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या ७२ हजार पदांच्या मेगाभरतीपैकी किती पदे भरण्यात आली याची माहिती सरकारने द्यावी. नुसत्या पोकळ घोषणा करून सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या संकटात असताना, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा दिला असता तर बरे वाटले असते. परंतु तसे न करता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री रथयात्रा काढणार आहेत. तुम्ही स्वत:ला राजे समजता का, असा सवालही मुंडे यांनी केला.राज्यावर चार लाख १४ हजार ४०० कोटींचे कर्ज आहे. गुजरातवर ३२ हजार ४१३ कोटी, उत्तर प्रदेशावर ६२ हजार ९८० कोटी, कर्नाटकावर २७ हजार ६८४ तर मध्य प्रदेशावर ३२ हजार ३६५ रूपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रावर इतके कर्ज का वाढले याचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे. याचा लौकिक घालवू नका. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना पक्षात घेऊ नका. अडचणीत आणतील, असा इशारा शेकापचे जयंत पाटील यांनी दिला.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडे