शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम विदाई

By admin | Updated: July 2, 2017 01:30 IST

विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी

- डॉ. नीरज देव  
विवेक माझा मित्र. चितेवर त्याचा देह चढविताना खूपच वजनदार झाला. चितेवर चढलेल्या वा चढविलेल्या त्याच्या देहाला डोळाभर न्याहळत असताना, कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर मोठे लाकडाचे खोड ठेवले व त्याचा चेहरा दिसेनासा झाला. त्या लाकडांमध्ये आता काष्ठवत् झालेला त्याचा देह; देहरूपी काष्ठ काष्ठातच दाबले गेले, चिता पेटविली गेली. तो दाह बसताच, मी झटकन मागे सरकलो. विचारांचे आवर्तन सुरू झाले. आज मी चटकन बाजूला सरकलो, तरी पुढे केव्हातरी मीही अशीच आगीची शाल लपेटून झोपणार.. तेवढ्यात शब्द कानावर आदळले अंतिम विदाई. अखेरचा निरोप! अंतिम विदाई? अरे, येथे तर फक्त मृतदेह आहे. काष्ठवत लाकडासारखा त्याला लाकडात रचणे ही का असते अंतिम विदाई? देह मोठा की आत्मा-देहातील चैतन्य? जर उत्तर चैतन्य असेल, तर ते जेव्हा जाते, त्याच वेळी खरी अंतिम विदाई झालेली असते. त्या वेळी कोण जवळ असेल-नसेल सांगता येत नाही. हे तर केवळ उपचार झाले देहाला मिटवायचे. मृत्यूचा न्याय सारखा असतो. आपले उपचार असतात वेगळे. मग अंतिम विदाई याला कसे म्हणायचे? कदाचित, असे असावे त्या विदाईला आपण नसतो, म्हणून ही विदाई आपल्याला फार महत्त्वाची वाटत असावी.
खरे सांगायचे, तर आपण जोडले जातो फक्त देहाशी. देहच ओळख, सर्वस्व असतो आपल्यासाठी. जोवर देह समोर असतो, तोवर बंध निर्माण होतात. देहाचा नाश झाला की, आपल्याला वाटते झाला शेवट, संपले सारे काही. तसे ते खोटेही नसते. बघा नं युद्धाचा शेवट शत्रूच्या देहनाशातच होतो. नष्ट झालेला शत्रूचा देह विजयाची ज्योत जागवितो. एखाद्या गुन्हेगाराला दिलेली सर्वोच्च शिक्षा देहनाशाचीच असते. देहनाशाने प्रश्न सुटतो का, हा प्रश्न अलाहिदा, पण तो शत्रू संपतो एवढे मात्र नक्की. जी गोष्ट शत्रू संबंधात असते, तीच मित्राबाबत, प्रियजनाबाबत असते. त्यांचा संपलेला देह यातना, वेदना देतो व विव्हल करतो. त्यांचा आत्मा अमर आहे, हे समाधान करून घेतानासुद्धा देहनाशाचे दु:ख जिवाला जाळत राहते. जर आत्मा अमर आहे, असे आपण मानत असू, तर हा शोक व्यर्थचा नाही का?मला वाटते, त्याचे कारण हे असावे की, आपल्या त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावभावना, संबंध, नाते, हेवेदावे सारे काही त्याच्या देहासोबत जळून जात असावेत व राहत असाव्यात फक्त एकांगी आठवणी - त्यात नवीन भर न पडणाऱ्या आठवणी. त्यामुळेच ती अंतिम विदाई असावी, त्याच्या देहाची आणि त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आपल्या स्मृतीची. अचानक माझ्या ध्यानात आले.. त्याच्या त्या देहासोबत माझ्याही व्यक्तित्त्वाचा एक हिस्सा जळत होता. अगदी माझ्याही नकळत, जो जोडला गेला होता त्याच्याशी. परंतु जिथे आपला काहीही संबंध नसतो, अशा एखाद्या तिऱ्हाईताचा चितेवर जळणारा देह पाहून, आपण का जळत असतो? मला वाटते, जळण्याची ती क्रिया कोठेतरी ही जाणीव देत असते, आपण ज्वलनशील आहोत, नश्वर आहोत याची. कळत-नकळत आपण पाहत असतो आपल्यालाच त्या चितेवर; आपुले जळणे पाहिले म्यां डोळा.