शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भूमाफियांना राज्य आंदण नक्कीच दिलेले नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 08:23 IST

आमचा जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावला जातोय असे सांगत न्याययंत्रणेकडे धाव घेणे यासाठी सरावलेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

रविकिरण देशमुख, वृत्तसंपादक

सरकारी जमिनी शोधून त्यावर अतिक्रमण करणे, संबंधित सरकारी यंत्रणा आपल्याकडे फिरकणार नाही याची व्यवस्था करणे, फिरकली तरी कारवाई करणार नाही किंवा त्याला विलंब होईल, अशी व्यवस्था करणे हे एक वेगळेच तंत्र आहे. त्याची गती फार वाढली आहे. बरेच लोक यात पारंगत आहेत. अतिक्रमण करून बरीच वर्षे झाली, की पाहा आम्ही इतकी वर्षे इथे पोटापाण्याचा व्यवसाय करतोय, आमचा जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावला जातोय असे सांगत न्याययंत्रणेकडे धाव घेणे यासाठी सरावलेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

लोकसंख्या जसजशी वाढत गेली तशा लोकांच्या गरजाही वाढत गेल्या. खेडी भकास होत गेली आणि रोजगारासाठी शहरांकडे लोंढे वाढले. निवाऱ्यासाठी जागा दिसेल तिथे पथारी पसरणे सुरू झाले. सार्वजनिक मालमत्ता देशाची संपत्ती आहे आणि ती वाट्टेल तशी वापरली जाऊ शकत नाही, ही भावना संपली. अशा जमिनींवर लोक आणून बसविणारेही वाढले. त्याच्या मागून एक नवीनच इंडस्ट्री वाढत गेली.

मुंबई महानगर प्रदेशात हा प्रकार जास्त आहे. झोपड्या वाढत गेल्या तसे छोटे-मोठे उद्योगधंदे फोफावले. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा. त्या कशा पूर्ण कराव्यात याची धोरणे आखण्यात आपण व्यस्त आहोत. अतिक्रमण केलेल्या जमिनीवर व्यवसाय थाटणे हा धंदा झाला. मग या अतिक्रमितांना संरक्षण दिले पाहिजे हा विचार बळावत गेला. अशा जमिनी विकसित करून अतिक्रमितांना कमीत कमी जागेत घरे बांधून देणे आणि उरलेल्या भूखंडावर बांधकाम करणे हा एक मोठा उद्योग वाढत गेला. त्याचीच उलाढाल आज कैक हजार कोटींची आहे.

जमीन कुठली बळकवावी याचे भान सुटत गेले. ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामाला आजही तोड नाही. १९२० च्या दशकात किती उदात्त हेतूने ही संस्था स्थापन झाली याबद्दल कृतज्ञता वाटली पाहिजे. मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होमला दिलेल्या जागेचा पूर्ण वापर होत नव्हता तेव्हा रिकामी जागा काही शेतकऱ्यांना तात्पुरती दिली होती. आज तिथे मोठे अतिक्रमण झाले आहे. दिवसेंदिवस १७ एकर जागेवर नवनवे हकदार तयार झाले. एवढेच नव्हे, तर संस्कारक्षम वयातील मुलांना संरक्षणाची गरज असताना जवळपास बार आणि परमिट रूम सुरू झाल्या.

‘लोकमत’ने वाचा फोडल्यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेण्याची वेळ का यावी, याचा विचार होत नाही. चुकीच्या गोष्टी दाखवून दिल्याशिवाय कारवाई करायची नाही अशी मानसिकता का बनत चालली आहे? संबंधित यंत्रणा काय करतात? त्या एरवी गप्प का असतात? जाब विचारला तर सांगितले जाते की मनुष्यबळ कमी आहे, कारवाईला गेलो तर हल्ले होतात, पोलिस संरक्षण मागितले तर ते उपलब्ध होत नाही, आदी.. आपल्या व्यवस्थेला कोणी मालकच नाही का? की आपल्या संवेदना संपुष्टात आल्या आहेत? 

अतिक्रमण करणे हा अधिकार मानला गेल्यामुळे जागोजागी झोपड्या आणि व्यवसाय वाढत गेले. असे होणे हे धोरणात्मक अपयश आहे, असे कोणाला वाटले नाही. चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नाहीत म्हणून लोक रस्त्यावरून चालतात. पदपथावर पर्यायी शॉपिंग सेंटर्स आली, पदपथ थोडासा शिल्लक असलाच तर दुकानदारांनी पावसापासून संरक्षण करण्यासाठी उभी केलेली तात्पुरती शेड कायमची झाली, विक्रीच्या वस्तू बिनदिक्कतपणे बाहेर टांगणे हा त्यांचा अधिकार झाला. महापालिकेची संबंधित यंत्रणा ‘खोका आणि ओटा’ (अवैध धंदा करणारे खोका टाकतात आणि दुकानदार ओटा बांधून दुकान वाढवतो) याच्या हिशेबात गुंतून गेली. मग रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांच्या संख्येत पादचाऱ्यांची संख्या अधिक असणे शोकांतिका आहे कसे वाटेल? 

प्रामाणिकपणे कर भरणारे, सर्व नियम कसोशीने पाळणारे आऊटडेटेड होत गेले. आता नियमबाह्य आणि नियमानुसार यातील फरक वेगाने संपत आहे. ज्याच्या हाती जे लागेल, त्याचा तो मालक आहे. अतिक्रमितांना संरक्षण देणे मतपेढीच्या राजकारणासाठी आवश्यक बनले आहे. अवैध बांधकामाच्या इमारती उभारणारा कोण होता, या दिशेने चर्चा जात नाही. कारण अनेकजण उघडे पडतात. उलट तिथे राहणारे कसे निष्पाप आणि गरजू आहेत यावर चर्चा घडविली जाते. न्याययंत्रणेने नियम दाखविल्यावर त्यांच्या रक्षणासाठी मंत्रिमंडळात निर्णय होतात. तशी ती ‘इंडस्ट्री’ समाधानाचा आणखी एक सुस्कारा सोडते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र