शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'किरीट सोमय्यांनी धमकावलं, भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं', संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 10:48 IST

Anvay Naik Suicide Case: संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, संजय राऊत हे किरीट सोमैय्या आणि भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून भाजपाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांना भाजपाने आत्महत्येसाठी भाग पाडले. तसेच या प्रकरणात आरोप झालेल्या अर्णब गोस्वामींकडे पैसे मागू नये, तसेच त्यांना बिल पाठवू नये, यासाठी किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दमबाजी केली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

याबाबत संजय राऊत म्हणाले की,अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली, यावर हे लोक बोलत नाही, त्यांनी यावर बोलंल पाहिजे. अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्याच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाजी, पत्रकबाजी करत होते. एक मराठी माणूस मराठी उद्योजक अन्वय नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे आत्महत्या केली. कारण अर्णव गोस्वामीला हे लोक वाचवत होते, असा आरोप राऊत यांनी केला.

या प्रकरणावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवरही आरोप केले, ते म्हणाले की, या किरीट सोमय्या यांनीसुद्धा त्याच्या आधी काही वेळा अन्वय नाईक यांना धमक्या दिल्या होत्या. अर्णव गोस्वामी यांच्याकडे पैसे मागायचे नाही, बिल पाठवायचे नाही, अशी दमबाजी केली होती. किरीट सोमय्या यांनी दोन वेळा अन्वय नाईक यांना धमकी दिली होती. भाजपाने अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते. हे अन्वय नाईक यांचे हत्यारे आहेत. त्यातील एक हत्यारा आज त्याच जमिनीवर जात आहे. भाजपावाले महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी लोकांना संपवू इच्छित आहे, असा आरोप संजय राऊन यांनी केला.

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. ते म्हणाले की, एक वेडा माणूस इकडे तिकडे फिरतोय. मी सांगितल्याप्रमाणे ते तुरुंगात जातील. किरीट सोमय्या तुरुंगात जाण्याचा रस्ता शोधत आहेत, मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही.

महाराष्ट्रातील जनता त्यांची धिंड काढणार आहे. कुठे बंगले आहेत ते दाखवा, ते बंगले अदृश्य झालेत काय. मी आधीच सांगितलंय की, त्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. याबाबत वारंवास स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यांना स्वप्नामध्ये बंगले दिसतात. मला वाटतं भाजपाला भूताटकीनं झपाटलं आहे. त्यांना स्वप्नात स्वत:च्याच बेनामी प्रॉपर्टी दिसत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा