शहरं
Join us  
Trending Stories
1
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
4
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
5
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
6
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
7
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
8
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
9
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
10
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
11
नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
12
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
13
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
14
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
15
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
16
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
17
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
18
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
19
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
20
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:48 IST

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

 

पुणे : ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.      

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

हरभरा, गव्हाचे पीक भरघोस येणारभरणे म्हणाले, “राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे तीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभरा व गव्हाची पेरणी होईल. 

बियाणे, खतांची चिंता सोडारब्बी हंगामात ११ लाख २३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात १४ लाख ५८ हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून ३१ लाख ३५ हजार टन खते मिळणार आहे. राज्यात सध्या १६ लाख १० हजार टन खत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची यंदा काळी दिवाळी : शरद पवारबारामती : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Excessive Rain Ruins Kharif, Rabi Season Offers Hope to Farmers

Web Summary : Rabi season offers hope after Kharif crop losses due to heavy rains. Dams and wells are full, potentially increasing Rabi cultivation to 65 lakh hectares. Agriculture Minister emphasizes coordinated planning for farmer benefits. Pawar criticizes inadequate government aid for flood-affected farmers.
टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस