शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:48 IST

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

 

पुणे : ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.      

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. 

हरभरा, गव्हाचे पीक भरघोस येणारभरणे म्हणाले, “राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे तीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभरा व गव्हाची पेरणी होईल. 

बियाणे, खतांची चिंता सोडारब्बी हंगामात ११ लाख २३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात १४ लाख ५८ हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून ३१ लाख ३५ हजार टन खते मिळणार आहे. राज्यात सध्या १६ लाख १० हजार टन खत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ची यंदा काळी दिवाळी : शरद पवारबारामती : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Excessive Rain Ruins Kharif, Rabi Season Offers Hope to Farmers

Web Summary : Rabi season offers hope after Kharif crop losses due to heavy rains. Dams and wells are full, potentially increasing Rabi cultivation to 65 lakh hectares. Agriculture Minister emphasizes coordinated planning for farmer benefits. Pawar criticizes inadequate government aid for flood-affected farmers.
टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस