शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 20:05 IST

Corona Vaccination: केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच भाजपने दिली आहे.

ठळक मुद्देभाजपकडून कोरोना लसींची आकडेवारी जाहीरआरोप-प्रत्यारोपांना भाजपकडून थेट उत्तर ट्विट करत दिली माहिती

मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोना लसींचा तुटवडा (corona vaccination) यांवरून गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असूनही मागणीप्रमाणे पुरवठा केला जात नसल्याचा आरोप सातत्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असताना मात्र राज्याला जास्त लसी दिल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. आता थेट सोमवार, १२ एप्रिल रोजी केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच दिली आहे. (keshav upadhye gave details related to corona vaccination in the state)

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून राज्याला किती कोरोना लसींचा साठा मिळाल, राज्यात किती जणांना लस देण्यात आली आणि राज्यात कोरोना लसींचा किती साठा शिल्लक आहे, याची थेट आकडेवारीच या ट्विटमध्ये दिली आहे. यावरून राज्यातील कोरोना लसीकरणावरून केले जात असलेले दावे, चर्चा आणि आरोप यांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे. 

जाणून घेऊया आकडेवारी

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिलेल्या आकडेवारीनुसार, १२ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्राला १ कोटी २२ लाख ४० हजार ३६० कोरोना लसींचा साठा मिळाला. राज्यात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या १ कोटी ०५ लाख ८१ हजार ७७० इतकी असून, राज्यात शिल्लक कोरोना लसींचा साठा १६ लाख ५८ हजार ५९० इतका असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

राहुल गांधीची केंद्रावर टीका

गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली असून, आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाState Governmentराज्य सरकार