शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 20:05 IST

Corona Vaccination: केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच भाजपने दिली आहे.

ठळक मुद्देभाजपकडून कोरोना लसींची आकडेवारी जाहीरआरोप-प्रत्यारोपांना भाजपकडून थेट उत्तर ट्विट करत दिली माहिती

मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोना लसींचा तुटवडा (corona vaccination) यांवरून गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असूनही मागणीप्रमाणे पुरवठा केला जात नसल्याचा आरोप सातत्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असताना मात्र राज्याला जास्त लसी दिल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. आता थेट सोमवार, १२ एप्रिल रोजी केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच दिली आहे. (keshav upadhye gave details related to corona vaccination in the state)

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून राज्याला किती कोरोना लसींचा साठा मिळाल, राज्यात किती जणांना लस देण्यात आली आणि राज्यात कोरोना लसींचा किती साठा शिल्लक आहे, याची थेट आकडेवारीच या ट्विटमध्ये दिली आहे. यावरून राज्यातील कोरोना लसीकरणावरून केले जात असलेले दावे, चर्चा आणि आरोप यांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे. 

जाणून घेऊया आकडेवारी

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिलेल्या आकडेवारीनुसार, १२ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्राला १ कोटी २२ लाख ४० हजार ३६० कोरोना लसींचा साठा मिळाला. राज्यात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या १ कोटी ०५ लाख ८१ हजार ७७० इतकी असून, राज्यात शिल्लक कोरोना लसींचा साठा १६ लाख ५८ हजार ५९० इतका असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

राहुल गांधीची केंद्रावर टीका

गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली असून, आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाState Governmentराज्य सरकार