शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:43 IST

मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षाच्या बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश

मिरज (जि.सांगली) : मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षाच्या बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास सचिवांना दिले आहेत. मात्र नगरविकास विभागाने अद्याप ही भरपाई दिली नसल्याने, नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मानवाधिकार संघटनेचे सुरेश हराळे, अ‍ॅड. मनीष कांबळे, व दीपक ढवळे यांनी रविवारी सांगितले.बेडग रस्त्यावर सांगली-मिरज महापालिकेच्या कत्तलखान्याजवळ मोकाट कुत्र्यांचा वावर कायमच आहे. ३० एप्रिल २०१० रोजी चिन्मयी कारंडे या बालिकेवर अशाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाला होता.चिन्मयीच्या मृत्यूबाबत हराळे, कांबळे व दीपक ढवळे यांनी सांगली-मिरज महापालिका व पोलिस प्रशासनाविरूध्द राज्य मानवी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणीनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने १० एप्रिल २०१७ रोजी नगरविकास मंत्रालयास, मृत चिन्मयीच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये नुकसान भरपाई तीन महिन्यात देण्याचे आदेश दिले. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास साडेबारा टक्के व्याजासह भरपाईचे आदेश दिले.