शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कन्याकुमारी गाठले १३ दिवसात !

By admin | Updated: March 27, 2015 00:29 IST

महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.

सहकारनगर : महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.ही मोहीम अनुभवी सायकलपटू उपेंद्र शेवडे यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. त्यांच्या सोबत असणारा त्यांचा मुलगा वेदांग, आनंद घाटपांडे या वेळीही मोहिमेत सहभागी होते. याखेरी सुहृद घाटपांडे, ओंकार ब्रह्मे, अद्वैत जोशी, नंदू आपटे, उमेश पवार आणि आशिष फडणीस हे मोहिमेचे सदस्य होते. सारसबाग येथील गजाननाचे दर्शन घेऊन मोहिमेची सुरवात केलीे. पहिलाच टप्पा हा १६५ किमीचा होता. खंबाटकी घाट; तसेच साताऱ्या जवळील खिंड पार करीत सायकलपटूंनी कराड गाठले.दुसऱ्या टप्प्यात निपाणी (११० किमी) आणि त्यानंतर धारवाड (१४५ किमी) असे टप्पे मोहिमेने घेतले. तिसऱ्या टप्प्यात सायकलस्वारांना वेगवान वारे आणि सातत्याने चढ उतार असलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागला. या रस्त्यात लागलेले दांडेलींचे सुरेख जंगल आणि येल्लापूरनंतर लागलेला २५ किमी अंतराचा घाट हे प्रमुख आकर्षण ठरले, अशी माहिती ओंकार ब्रह्मे यांनी दिली. अंकोला ते मारवंथे हे १३५ किमीचे अंतर पार केले. या टप्प्यात चढउतार तर बरेच होते खेरीज रस्ताही खराब असल्याने सायकलस्वारांना अडचणींचा सामना करावा लागला. किनारपट्टीच्या बाजूबाजूने मार्गक्रमण करीत मोहिमेने ११० किमी अंतर पार करीत मँगलोर गाठले. केरळमधील अप्रतिम निसगसौंदर्य, सुरेख किनारे, नारळी पोफळीच्या बागा, अद्यापही सुस्थितीत असलेले किल्ले आणि प्रसिद्ध मंदिरे यामुळे हा प्रवास अतिशय बहारीचा झाला, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा १०० किमी अंतर पार करून, सायकलस्वारांनी गुरुवायुरच्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेऊन दिवसाची सांगता केली.या वेळी मोहिमेतील सदस्यांचा आश्रमाच्या वतीने एक छोटेखानी सत्कार करण्यात आला. मोहिमेतील काही सदस्यांचे कुटुंबीयही या वेळी स्वागताला उपस्थित होते. या मोहिमे दरम्यान प्रचंड उन, घामाच्या धारा, दमणूक असे सर्व काही अनुभवले पण त्याहीपेक्षा मोहीम यशस्वी केल्याचा आनंद मोठा होता, असे आशिष फडणीस म्हणाले. (प्रतिनिधी)४ अकराव्या दिवशी ११० किमी अंतर पार करून, मोहीम चावरा येथे पोहोचली व बाराव्या दिवशी ९० किमी पार करून, तिरुवनंतपुरम गाठले. मोहिमेच्या शेवटच्या दिवशी १०० किमी अंतर पार करावे लागले; परंतु एका स्थानिक सणासाठी रस्ते बंद झाल्यामुळे, अक्षरश गल्लीबोळांतून वाट काढत सायकलस्वार कन्याकुमारी येथे पोहोचते झाले.