शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा वेळीच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:03 PM

इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, अस आव्हाड ट्विट करून म्हणाले. 

मुंबई - भाजपला शिंगावर घेणारे आणि आपल्या सडेतोड भुमिकेसाठी चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपल्या वक्तव्याचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे.

इंदिरा गांधी यांनी असाच एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र जयप्रकाश नारायण यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्याचा परिणाम झाला आणि इंदिरा गांधी यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच इंदिराजी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावले. त्या जगात एक कणखर व्यक्ती म्हणून परिचीत आहेत. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर वेळीच खुलासा केला ते बरं झालं. मात्र आमच्या नेत्यांचा अनादर केल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा  अशोक चव्हाण यांनी ट्विट करून दिला आहे.  

या संदर्भात खुलासा करताना आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, असही आव्हाड ट्विट करून म्हणाले.