शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

'शरद पवारांवर कसा दबाव निर्माण केला गेला, हे दमानियांना माहिती नाही'; जितेंद्र आव्हाडांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 20:23 IST

Sharad Pawar Anjali Damania news: बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. त्यावरून अंजली दमानियांनी पवारांनाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले. 

Jitendra Awhad Sharad Pawar Anjali Damania News: 'काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत', या शरद पवारांच्या विधानावर अंजली दमानियांनी टीका केली. इतकंच नाही, तर त्यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला दिला. दमानियांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'शरद पवारांनी किती वेळा आणि कुणा कुणाचे राजीनामे मागितले होते, हे दमानियांना माहिती नाही.' 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, "धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो... बजरंग सोनावणे देखील, हे सगळेच्या सगळे लोक, हे त्यांच्याच (शरद पवार) तालमीत वाढले आहेत. ते कसे आहेत. काय आहेत? राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते." 

शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे -दमानिया

"त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. आताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची परिस्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या लोकांना मोठं करण्यामध्ये तुमचाच हातभार किती होता, हे आत्मपरीक्षण देखील शरद पवारांनी करणे गरजेचं आहे", अशी टीका अंजली दमानियांनी केली.

जितेंद्र आव्हाडांनी दमानियांना काय दिले उत्तर?

अंजली दमानियांच्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शरद पवारांच्या मनात काय होतं, ही प्रत्येक गोष्ट काय जनतेसमोर येईल, असं मला वाटत नाही. किती वेळा त्यांनी राजीनामे मागितले होते? आणि कुणा-कुणाचे मागितले होते. आणि मग नंतर अंतर्गत दबाव कसे निर्माण झाले, हे कदाचित अंजली दमानियांना माहिती नसेल, त्या कधी वैयक्तिक भेटल्या, तर मी त्यांना नक्कीच बोलेन", असे उत्तर   

शरद पवार काय म्हणालेले?

"काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशासंबंधी अत्यंत सक्त असे धोरण आखण्याची गरज आहे. बीडला पूर्वीच्या वैभवाचे दिवस परत कसे येतील, याची काळजी घ्यावी", असे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडanjali damaniaअंजली दमानियाBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याDhananjay Mundeधनंजय मुंडे