शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

जळगाव : संविधान मेळाव्यापूर्वीच ४१ जणांना अटक, लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:12 AM

पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता.

जळगाव : पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता. सरकारने लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सुरुवातीला नूतन मराठा महाविद्यालयात गुजरातमधील दलित नेते व आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मुख्य उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यात हिंसक प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर मेवानी यांच्या सभेला सध्या राज्यात कोठेही परवानगी न देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.कोल्हापूरमध्ये तोडफोड; १८० जणांना अटककोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी रविवारी येथे आणखी १९ जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसांत १८० आंदोलकांना अटक झाली आहे. पोलिसांनी सर्वांची छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून तोडफोड करणाºया आंदोलकांना पकडले जात आहे.कन्हैया कुमारच्या उपस्थितीत परिषद-पुणे : दलित महासंघाच्यावतीने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या उपस्थितीत २८ जानेवारी रोजी ‘सावधान परिषदे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकारांना दिली. भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धर्मांध शक्तींपासून दलित समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन केल्याचे सकटे यांनी सांगितले. या परिषदेत लहुजी संघर्ष सेना, लहुजी महासंघ, दलित संघर्ष समिती, आ.ल.व.सा.फांऊडेशन, अखिल भारतीय बहुजन सेना, लहुजी स्मारक समिती संगमवाडी, दलित विकास आघाडीसह विविध संघटना भाग घेणार आहेत.प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी-सांगली : कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागून त्यात एक-दोघांचा बळी गेल्याचा दावा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केला आहे. त्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीराव भिडे यांच्याविरुद्धचे गुन्हे शासनाने सन्मानपूर्वक मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.सरकार हमसे डरती है...पोलिसांनी धरपकड करताच, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. अटक झालेल्यांमध्ये प्रा. शेखर सोनाळकर, वासंती दीघे, गायत्री सोनवणे, मीराबाई सोनवणे, प्रतिभा शिरसाठ आदींचा समावेश आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारामागे अदृश्य लोक - उद्धव ठाकरेमुंबई : अदृश्य लोक येतात आणि जातीपातीचे राजकारण करतात. जातीपातीचे राजकारण करत जो कोणी स्वत:ची पोळी भाजून घेणार असतील त्यांना शिवसेना सोडणार नाही. कोरेगाव-भीमा घडविणा-यांनी हिंमत असेल तर पुढे येऊन सांगावे असे आव्हान देतानाच राममंदिर बांधण्याची भाषा करणारे बाबरी मस्जिद पाडताना पळून का गेले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. चेंबूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव