शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

चित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 8:29 PM

एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे..

ठळक मुद्दे ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त

पुणे :  सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला जर परवानगी दिली असेल तर त्यावर वादंग निर्माण करणे चुकीचे आहे. एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांनी चित्रपटांवरून वादंग निर्माण करणाऱ्यांवर टीका केली. मात्र जेव्हा काही चित्रपटांबददल असे वादंग निर्माण झाले. त्या निर्मात्यांच्या बाजूने मी उभा राहिलो. पण  ‘इंदू सरकार’च्या वेळी वादाला तोंड फुटले. तेव्हा माझ्या बाजूने कुणी उभे राहिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.मधुर भांडारकर यांनी 2017 साली दिग्दर्शित आणि सहनिर्मित केलेल्या ‘ इंदू सरकार’ या राजकीय चित्रपटाची  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात शुक्रवारी भर पडली. भांडारकर यांनी  ‘ चांदनी बार’,  पेज थ्री’,‘कॉर्पोरेट’, ‘ट्रँफिक सिग्नल’,‘फँशन’ या चित्रपटानंतर  ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त केला. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे वादंग निर्माण झाला होता. या चित्रपटात 1975 च्या आणीबाणीच्या काळामधील चित्रण दाखविताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांना चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे असा आक्षेप कॉंग्रेस समर्थकांनी घेतला होता. कोणत्याही चित्रपटांवरून निर्माण होणा-या वादंगासंदर्भात  मधुर भांडारकर यांना पत्रकारांनी विचारले असता ’चित्रपट सेन्सॉर संमत झाल्यास त्यावर वाद घालणं चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितलं. हा चित्रपट संग्रहालयाकडे देताना आनंद होत आहे.  आजपर्यंत सगळे चित्रपट सामाजिक प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच निर्माण केल्याने रसिक त्याच्याशी आपोआप रिलेट होऊ शकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.-------------------------------------------------------------------------------------------इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरे होणार; एफटीआयआयचे विद्यार्थी सहभागी करून घेणार देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या  ‘गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ (इफ्फी) चे यंदाचे  सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष दणक्यात साजरे केले जाणार असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या इफ्फीमध्ये विद्यार्थी विभाग बंद करण्यात आला. एफटीआयआयच्या विद्याथर््यांना इफ्फीपासून दूर ठेवण्यात आले. त्याच एफटीआयआयच्या विद्याथर््यांना यंदा व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याचे इफ्फीच्या मुख्य आयोजन समितीचे सदस्य मधुर भांडारकर यांनी सांगितले. तसेच इफ्फीसाठी काही चित्रपटगृह वाढविण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMadhur Bhandarkarमधुर भांडारकर bollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा