शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 8:37 PM

राष्ट्रपती राजवटीवरून जे आरोप केले जात आहेत, ते निव्वळ राजकीय हेतूने आहेत.

मुंबई : राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली आहे. शिवसेनेला तीन दिवस हवे होते, आता तर पाच दिवस झाले आहेत. तरीही त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. राज्यपालांनी अजून सहा महिने दिले असल्याचा टोला शहा यांनी लगावला. तसेच भाजपा मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या वृत्तावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

राष्ट्रपती राजवटीवरून जे आरोप केले जात आहेत, ते निव्वळ राजकीय हेतूने आहेत. जनतेची सहानुभूती निर्माण करण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं नुकसान झालं असेल तर ते भाजपाचं झालंय. कारण आमचं काळजीवाहू सरकार अस्तित्वात होतं. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री होते. निकालापासून विधानसभेची मुदत संपेपर्यंत १८ दिवसांचा कालावधी होता. एवढा वेळ अन्य कुठल्याही राज्यात दिला गेला नव्हता. या दिवसांमध्ये कुणीही समूह किंवा पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकत होतं. परंतु, ना शिवसेनेनं केला, ना काँग्रेसनं, ना राष्ट्रवादीनं, ना आम्ही. त्यानंतर विधानसभेचा कालावधी संपल्यानं राज्यपालांना आमंत्रित करावं लागलं. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उचित कार्यवाही केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. 

राज्यपालांनी संधीच दिली नाही, या आरोपात काहीच तथ्य नाही. आजही कुठलाही समूह सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतो, बहुमत दाखवून सरकार स्थापन करू शकतो. सत्तास्थापनेची संधीच न दिल्याचा बालिश दावा कपिल सिब्बल यांच्यासारखे ज्येष्ठ वकील करतात, हे चमत्कारिक आहे. आजही संधी आहे. तुम्ही बनवा की सरकार, असे आव्हानही शहा यांनी काँग्रेसला दिले. 

भाजपाने जनादेशाचा अनादर केलेला नाही. आम्ही आमच्या मित्रांसोबत निवडणूक लढलो होतो. परंतु, ऐनवेळी त्यांनी वेगळ्या मागण्या ठेवल्या. त्या मान्य करणं शक्य नव्हतं. त्यामुळे १०५ आमदारांच्या बळावर आम्ही दावा करू शकत नव्हतो. शिवसेनेला दोन दिवस वाढवून हवे होते, आता तर पाच दिवस झालेत. राष्ट्रपती राजवट लागू केली नसती, तर भाजपाचं काळजीवाहू सरकारच चालवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला असता, असा खुलासाही शहा यांनी केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस