शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

घरे देणे पालिकेचे कर्तव्य नाही

By admin | Updated: January 7, 2017 06:11 IST

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे कर्तव्य नाही

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे कर्तव्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महापालिकेतून निवृत्त होऊनही भाडेतत्त्वावरील घराचा ताबा न सोडणाऱ्या सुमारे ४००० कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास नकार दिला. या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला न दिल्यास महापालिका संबंधितांवर फौजदारी कारवाई करू शकते, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेली घरे कायमस्वरूपी नावावर करण्यात यावी, यासाठी विक्रोळी पार्कसाइट, बर्वेनगर (घाटकोपर), मिठानगर (गोरेगाव), मालवणी (मालाड) येथे महापालिकेच्या बैठ्या चाळीत राहणाऱ्या ९०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.१९८९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि सुधार समितीने महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत, असा प्रस्ताव माहापालिका आयुक्तांपुढे ठेवला होता. तशी योजनाही तयार करण्यात आली. मात्र ही योजना कागदावरच राहिली. उलट २०१० मध्ये तत्कालीन आयुक्तांनी भाडेतत्त्वावर राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे खाली करण्याचा आदेश दिला. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे मिळू शकत नाहीत, हेही स्पष्ट केले. मात्र महापालिकेच्या १९८९ च्या योजनेचा हवाला देत निवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या २०१० च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.परंतु, महापालिकेने ही योजना प्रत्यक्षात उतरवणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले. भाडेतत्त्वावर दिलेली घरे लाटण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झाली आहे, या वृत्तीला आळा बसवणे आवश्यक आहे. मुंबईत घरांसाठी जागा मिळणे अशक्य आहे. तसेच ते आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही, अशी भूमिका महापालिकेने उच्च न्यायालयात घेतली.‘या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घरे अडवल्याने सध्या महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. रुग्णालय, फायर ब्रिगेड, पाणी इत्यादी महत्त्वाच्या विभागांत काम करणारे कर्मचारी घरे मिळवण्याच्या यादीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामावर परिणाम होत आहे. तसेच याचिकाकर्त्यांना घरे दिली तर महापालिकेत सध्या काम करणाऱ्या एक लाख ३० हजार कर्मचाऱ्यांचीही भविष्यात सोय करावी लागेल,’ असा युक्तिवाद महापालिकेच्या वतीने करण्यात आला. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या भूमिकेशी सहमती दर्शवत घरे कायमची कर्मचाऱ्यांच्या नावे करण्याचे अशक्य असल्याचे म्हटले. ‘सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे कोणाच्याही नावे करणे शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सार्वजनिक मालमत्तेचा विकास करायचा असल्यास किंवा विक्री करायची असल्यास त्यासाठी निविदा काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे कोणाच्याही नावे करण्याचा आदेश आम्ही आयुक्तांना देऊ शकत नाही. त्यामुळे निवृत्त होऊनही घरांचा ताबा न देणाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला द्यावा. वेळेत ताबा न दिल्यास महापालिका फौजदारी कारवाई करू शकते. तसेच संबंधितांकडून नुकसानभरपाई घेऊ शकते. प्रसंगी त्यांची वैयक्तिक मालमत्ताही जप्त करू शकते. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य नाही,’ असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या. (प्रतिनिधी)>भाडे वसूल होणारज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घराचा ताबा देण्यास नकार दिला त्यांचे अंशदानही महापालिकेने थकीत ठेवले आहे. त्यांच्याकडून घराचे भाडे थकीत असल्याने अंशदानातूनच भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांकडून बाजारभावानेच भाडे वसूल करण्यात येणार आहे.महापालिकेच्या या निर्णयालाही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने तेही फेटाळले. ‘कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे घरांचा ताबा घेणाऱ्यांना आम्ही दिलासा देऊ शकत नाही. याचिकाकर्त्यांनी वेळेत घरे मोकळी केल्यास महापालिका उर्वरित रक्कम त्यांना परत करेल,’ असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाचा परिणाम पालिकेच्या ४०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर होणार आहे.