शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सगळेच सुरू मग आता लग्नातील पंगतीवरच निर्बंध का? थेट सवाल तोही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 15:24 IST

मद्याविक्री आधीच सुरू केली, आता हॉटेल्स आणि बारही सुरु केले..

ठळक मुद्देकेटरिंग असोसिएशनचा सवाल: सरकारी निर्णयातील विसंगतीचांगला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मोडून पडला असल्याची तक्रार आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा तब्बल सहा महिने बुडाला रोजगार

पुणे: मद्याविक्री आधीच सुरू केली, आता हॉटेल्स आणि बारही सुरु केले, लग्नकार्यातील उपस्थितीवरच निर्बंध कशासाठी? हा सवाल विचारला आहे लग्नातील पंगतीवर व्यवसाय अवलंबून असणाऱ्या केटरिंग चालकांनी! तोही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच! 

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून सरकारी निर्णयातील विसंगतीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. मिशन बिगीन अंतर्गत अनेक गोष्टी सुरू झाल्या, मात्र लग्नकार्यातील ५० जणांच्या उपस्थितीवरचे निर्बंध आहे तसेच आहेत. त्याचा थेट परिणाम केटरिंग चालकांवर झाला आहे. जेवणावळीच होत नसल्याने त्यांच्या हाताला पुरेसे कामच राहिलेले नाही. मार्च ते जूलै २०२० या काळात फक्त लग्नाचे ६० मुहूर्त होते, त्याशिवाय अन्य कार्यक्रम. या सगळ्यातील परिस्थिती केवळ ५० होती. त्यामुळे एरवी चांगला रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मोडून पडला असल्याची तक्रार असोसिएशनने केली आहे.या एका निर्बंधामुळे फक्त केटरिंगच नाही तर मंगलकार्यालयांपासून ते भटजी, फोटोग्राफर्स, व्हिडीओ चित्रीकरण करणारे, वाढपी, लहान मुलांची खेळणी तयार करणारे असे एकूण ५० व्यवसाय व त्यावर अवलंबून असणाऱ्या आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा तब्बल सहा महिने रोजगार बुडाला. त्यातील अनेक व्यावसायिकांनी सिझन लक्षात घेऊन कर्ज काढले होते, ते फेडता येत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. ते संघटीत नसल्याने सरकारकडून त्यांना एका पैशाचीही मदत होत नाही असे असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.एसटी बसला पुर्ण क्षमतेने, हॉटेल, बारला ५० टक्के ऊपस्थितीने परवानगी दिली, मग लग्नकार्यांनीच सरकारचे काय घोडे मारले आहे असे सरपोतदार म्हणाले. कोरोना संकट सर्वांवरच आले आहे, मात्र त्यातून मार्ग काढला जात आहे, तसाच मार्ग लग्नकार्यातील ऊपस्थितीची अट ५० ऐवजी किमान २०० करून काढावा अशी मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारfoodअन्नmarriageलग्न