शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
2
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
3
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
4
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
5
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
6
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
7
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
8
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
9
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
10
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
11
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
12
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
13
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
14
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
15
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
16
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
17
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
18
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
19
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
20
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

धर्म, देवाच्या नावावर मत मागणे योग्य की अयोग्य?; ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:42 IST

हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

मुंबई – देशात काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत. क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तसे निवडणुकीच्या प्रचारात असतात. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, त्यात काही गोष्टींवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. केवळ भाजपा सत्तेत बसलाय म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हीट विकेट काढायची असं अनेकदा होतंय. प्रचारात धर्म, देवाच्या नावावर मते मागितली जात आहेत ते योग्य आहे की अयोग्य याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, १९८७ मध्ये विलेपार्ल्यात पोटनिवडणूक लागली होती. रमेश प्रभू हे आमचे विजयी झाले होते. ही देशातील पहिली निवडणूक होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि जिंकली गेली. या निवडणुकीत भाजपाही आमच्या विरोधात होती. त्या निवडणुकीपासून अगदी १९९५ साली आमचे सरकार आले तोपर्यंत आमचे ५-६ आमदार त्यात सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, बापू खेडेकर, रमाकांत मयेकर आणि रमेश प्रभू हे बाद ठरवले गेले, परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकशाहीतला मुलभूत असलेला मतदानाचा अधिकार यांच्यासह शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. कारण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगे असं म्हटलं होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत काही बदल केले अशी शक्यता वाटते. केले असतील तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत. कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदान करण्यास सांगितले होते. अमित शाह यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू. धर्म आणि देवाच्या नावावर मतदान मागणे हे आचारसंहितेत बसत की नाही? जर बसत असेल तर आम्ही देखील पुढच्या निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून मतदान मागू. आचारसंहितेत जर निवडणूक आयोगाने बदल केला असेल तर तो कधी केला याबाबत कळवावे. आताही निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना या निर्णयाबाबत अवगत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. भाजपाचा कारभार रामभरोसे चालला आहे. मी राजकारण आणू इच्छित नाही. जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे की बरोबर हे निवडणूक आयोगाने कळवावे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHindutvaहिंदुत्वNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग