शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

धर्म, देवाच्या नावावर मत मागणे योग्य की अयोग्य?; ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:42 IST

हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

मुंबई – देशात काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत. क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तसे निवडणुकीच्या प्रचारात असतात. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, त्यात काही गोष्टींवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. केवळ भाजपा सत्तेत बसलाय म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हीट विकेट काढायची असं अनेकदा होतंय. प्रचारात धर्म, देवाच्या नावावर मते मागितली जात आहेत ते योग्य आहे की अयोग्य याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, १९८७ मध्ये विलेपार्ल्यात पोटनिवडणूक लागली होती. रमेश प्रभू हे आमचे विजयी झाले होते. ही देशातील पहिली निवडणूक होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि जिंकली गेली. या निवडणुकीत भाजपाही आमच्या विरोधात होती. त्या निवडणुकीपासून अगदी १९९५ साली आमचे सरकार आले तोपर्यंत आमचे ५-६ आमदार त्यात सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, बापू खेडेकर, रमाकांत मयेकर आणि रमेश प्रभू हे बाद ठरवले गेले, परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकशाहीतला मुलभूत असलेला मतदानाचा अधिकार यांच्यासह शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. कारण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगे असं म्हटलं होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत काही बदल केले अशी शक्यता वाटते. केले असतील तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत. कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदान करण्यास सांगितले होते. अमित शाह यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू. धर्म आणि देवाच्या नावावर मतदान मागणे हे आचारसंहितेत बसत की नाही? जर बसत असेल तर आम्ही देखील पुढच्या निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून मतदान मागू. आचारसंहितेत जर निवडणूक आयोगाने बदल केला असेल तर तो कधी केला याबाबत कळवावे. आताही निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना या निर्णयाबाबत अवगत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. भाजपाचा कारभार रामभरोसे चालला आहे. मी राजकारण आणू इच्छित नाही. जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे की बरोबर हे निवडणूक आयोगाने कळवावे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHindutvaहिंदुत्वNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग