शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 8:41 AM

Murud-Janjira Killa : भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता.

मुंबई - छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले स्वराज्यात जिंकलेले आपण ऐकलं आहे. मात्र एक असा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, ब्रिटीश, मुघल, पोर्तुगीज कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड किनारपट्टी गावात आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या चहूबाजूला अरबी समुद्राने वेढलं आहे. 

मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये भक्कमपणे उभं राहून अनेक आक्रमणांना सामोरं गेला आहे. या किल्ल्याबाबत अनेक रहस्य आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटीश, पोर्तुगीज, मुघल, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिमाजी आप्पा आणि संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे हा जंजिरा किल्ला नेहमी अंजिक्य राहिला.

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या काही मीटर अंतरावर गेल्यावरच दिसू शकतो अशाप्रकारे बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूला या किल्ल्यात प्रवेश करणं आव्हानात्मक असायचे.  

१५ व्या शतकात अहमदनगरच्या सल्तनीत मलिक अंबरच्या देखरेखीमध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं. मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची तटबंदी ४० फुट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. हा किल्ला पंच पीर पंजतन शाह बाबांच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते. शाह बाबांची थडगीही या किल्ल्यात आहे.

भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. आजही अनेक तोफा किल्ल्यावर आढळून येतात. १६६९ मध्ये स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहिम आखली होती. मात्र हा किल्ला राजांना जिंकता आला नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल, १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडFortगड