शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:29 IST

सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.   

मुंबई : बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याबाबतच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुजोरा दिला. सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.   

अंतिम आठवडा प्रस्तावाला फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बारसूचे बोअर होल्स घेताना काही गावकऱ्यांनी विरोध केला. त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. कातळशिल्पाचे संवर्धन झालेच पाहिजे. राज्य हिताच्या गोष्टींना विरोध करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

बारसू विरोधकांना बंगळुरूतून पैसा ज्यांना या देशाचा विकास नकोय तीच माणसे आरे, बुलेट ट्रेन, बारसूच्या आंदोलनात दिसताहेत. यातील काही माणसे नर्मदा आंदोलनातही होती. या आंदोलकांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर ही माणसे वारंवार बंगळुरूला जाताहेत. यांच्या अकांउंटमध्ये तिथून पैसे येतात. ग्रीन पीस या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात हे लोक आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

उद्योगात महाराष्ट्र पुन्हा अव्वल  हे सरकार आल्यावर १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२३ या एक वर्षात १०९ ऑफर लेटर दिले असून एकूण १ लाख ४ हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली असून ७८६६५ रोजगार उपलब्ध होणार आहेत. दावोसमध्ये २५ सामंजस्य करार होऊन ८० हजार कोटींची गुंतवणूक झाली असून ९६ हजार रोजगार निर्माण झाले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात महिला सुरक्षितच  महिला अत्याचारासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल होऊन ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या केंद्राच्या निर्देशानुसार ते केले जाऊन गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अपहरणासंदर्भात राज्याचा क्रमांक १० वा असून, राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण होणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुपोषण कमी होतेय मार्च २०२१         १.४३ टक्के मार्च २०२२        १.२४ टक्के मार्च २०२३        १.२२ टक्के 

राज्यात बालकांमधील तीव्र कमी वजनाची टक्केवारी खाली येत असून, आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी होत असल्याचे फडणवीस म्हणाले. 

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सोडणार नाहीआळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही वस्तुस्थिती नाही. औरंगजेबाचे पोस्टर्स, स्टेटस हा योगायोग नाही. तो देशातील मुस्लिमांचा हिरो कधीच होऊ शकत नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. 

पोलिस दलात १८,५५२ नवीन पदे - पोलिस दलात आता १,९६० ऐवजी २,०२३ नुसार नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. - शहरी भागात दोन पोलिस स्थानकांमधील अंतर चार किमीपेक्षा अधिक नसेल तर ग्रामीण भागात ते १० किमीपेक्षा अधिक नसेल याची काळजी घेण्यात येईल. - पोलिसांच्या १८,३३१ पदांची भरती सुरू असून, १८,५५२ पदांचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा