शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदल्यांचे अधिकार पुन्हा पोलीस प्रमुखांकडे

By admin | Updated: July 24, 2015 02:02 IST

कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणास्तव स्वत:च्या किंवा इच्छुक असलेल्या जिल्हा अथवा आयुक्तालयात बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या पोलिसांना

जमीर काझी, मुंबईकौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणास्तव स्वत:च्या किंवा इच्छुक असलेल्या जिल्हा अथवा आयुक्तालयात बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या पोलिसांना आता त्यासाठी मुंबईतील पोलीस मुख्यालयात येरझाऱ्या घालाव्या लागणार नाहीत. संबंधित आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांकडून या बदल्या होऊ शकणार आहेत. पोलीस महासंचालकांनी ३ महिन्यांपूर्वी आपल्याकडे घेतलेले अधिकार पुन्हा घटकप्रमुखांकडे वर्ग केले आहेत. संबंधित घटकातील रिक्त जागा व आरक्षित पदाचा विचार करून आता स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार आहे. पोलीस दलातील कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदाच्या कर्मचाऱ्यांसाठी आंतरजिल्हा बदली सवलत आहे. गेल्या एप्रिलमध्ये त्याबाबतचे घटकप्रमुखांचे अधिकार महासंचालकांनी आपल्याकडे काढून घेतले होते. मात्र त्याबाबत इच्छुकांबरोबरच लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या शिफारशी येऊ लागल्याने महासंचालक कार्यालय वैतागून गेले. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत आंतरजिल्हा बदलीचे अधिकार स्थानिक स्तरावर संबंधित घटकप्रमुखांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. घरच्या आर्थिक दुरवस्थेबरोबरच पोलीस दलाच्या आकर्षणापोटी ग्रामीण भागातील अनेक तरुण पोलीस भरतीसाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी आयुक्तालयात येतात. जिल्ह्याच्या तुलनेत या ठिकाणी अधिक जागा असल्याने भरती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा अधिक कल असतो. नियुक्ती झाल्यानंतर किमान ५ वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना स्वत:च्या जिल्ह्यात किंवा अन्य इच्छुक जिल्ह्यांमध्ये बदली करून घेण्याची संधी असते. त्यासाठी त्यांच्या कौटुंबिक अडचणी, आजारपण किंवा अन्य कारणांमुळे बदलीचा अर्ज घटकप्रमुखाच्या मान्यतेने इच्छुक ठिकाणच्या पोलीस प्रमुखाकडे पाठवावयाचा असतो. तेथील रिक्त जागा व आरक्षित पदाचा विचार करून अर्जाच्या क्रमानुसार निर्णय होतात. मात्र गेल्या वर्षी पोलिसांच्या बदल्यांचा अधिकाराबाबतच्या सुधारित अधिनियमाने अंमलबजावणी व आस्थापना मंडळांची राज्य सरकारने स्थापना केली.त्यात आंतरजिल्हा बदलीचे अधिकार महासंचालक कार्यालयाकडे आले. गेल्या एप्रिलमध्ये त्यावर अंमलबजावणीचा निर्णय पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी घेतला. राज्यातील सर्व घटकप्रमुखांनी अशा प्रकारे बदलीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी, नियुक्ती व संदर्भपत्रे पाठविण्याचे आदेश कार्यालयाने दिले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी परस्पर मुख्यालयात अर्ज केले. त्यानुसार चार महिन्यांत अशा प्रकारचे जवळपास साडेचार हजारांवर अर्ज मुख्यालयात जमा झाले. त्याची पडताळणी केली असता त्यात बदलीसाठी इच्छुकांच्या अर्जाऐवजी नावाची यादी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या रिक्त जागा व इच्छुकांच्या बदलीचा क्रम स्थानिक घटकप्रमुख योग्य प्रकारे करू शकतात, हे दिसून आल्याने हा अधिकार पुन्हा त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.