शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:42 IST

संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला.  

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात पक्षाच्या ५४ आणि अपक्षांच्या ६ जागा ते धरून पुढे कामाला लागा असं अजित पवारांनी बैठकीत सांगितले. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जावी. जागावाटपाची प्राथमिक बैठक झालेली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. 

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महायुतीची नागपूरात बैठक झाली, त्यात जागावाटपाचा सर्वसाधारण फॉर्म्युला काय असावा याची प्राथमिक चर्चा झाली. त्यावर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवानिमित्त काही काळ जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल. पक्षातील कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिले जातील यावर आज चर्चा झाली. मागील वेळी आपण ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यासोबतच जे अपक्ष आपल्यासोबत आहेत ते धरून ६० चा आकडा आहे. ते धरून तुम्ही पुढे वाटचाल करा असं अजितदादांनी म्हटलं. परंतु आम्ही ६० च जागा लढणार ही बातमी चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना विद्यमान जागांचे सूत्र होते. २०१९ च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना यश मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या विद्यमान जागा जास्त होत्या. लोकसभेत त्याप्रमाणे सूत्र होते. आता यावेळी सुद्धा तेच असेल. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असावा असाही निकष जागावाटपात असावा असं बैठकीत ठरवलं आहे असं सुनील तटकरेंनी सांगितले. 

दरम्यान,  राजकोट प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. मात्र पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित येतात. ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारतात हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उचित आहे हे वाटत नाही. संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला. 

नितेश राणेंचं ते विधान चुकीचे

मशिदीबाबत नितेश राणे यांनी केलेले विधान अतिशय अयोग्य आहे. त्याचा मी निषेध करतो. हा देश संविधानाच्या आधारे चालतो. सर्वधर्म समभाव ही देशाची मूळ संकल्पना आहे. मतमतांतरे असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात पण याप्रकारची विधाने करणे अयोग्य आहे असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं आहे. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४