शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

"विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे", नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 19:02 IST

Nana Patole Criticize Mahayuti Government:  विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरु आहे. कोकणी माणसाचा नाही तर सत्तेतील महायुतीच्या नेत्यांचा विकास झाला आहे. महायुती सरकारने काही काम केले नाही म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मुंबई - कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी कोकणातील पक्ष संघटना मजबूत करा. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले की, विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरु आहे. कोकणी माणसाचा नाही तर सत्तेतील महायुतीच्या नेत्यांचा विकास झाला आहे. महायुती सरकारने काही काम केले नाही म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कोल्हापुरात विशाळगडावर धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कोकणातही हिंदू मुस्लीम एकत्र राहतात, मंदिरात मुस्लीम लोक दिसतात तर दर्ग्यात हिंदु लोक दिसतात पण त्याला छेद देण्याचे काम सुरु आहे, त्याला बळी पडू नका. लोकसभेला मविआचे ३२ खासदार विजयी झाल्याने विधानसभेला सत्ता जाणार या भितीने हे वाद निर्माण केले जात आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ या योजना आणल्या आहेत, महागाईत बहिणींच्या चुली बंद केल्या त्यावेळी महायुती सरकारला त्यांची आठवण झाली नाही आता निवडणुकीमुळे आठवण झाली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या मेळाव्याला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवली, त्यासाठी वर्षभर सदस्य नोंदणी करून ७० हजार सदस्यांची नोंदणी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही सदस्य नोंदणी केली, पण आपण विजय मिळवू शकलो नाही. काँग्रेस पक्षाला कोकणात पुन्हा गतवैभव आणायचे असेल तर जनभावना लक्षात घेऊन काम केले पाहिजे, मी मोठा ही भावना योग्य नाही. मी म्हणजे पक्ष ही भावना पक्षाच्य़ा वाढीला मारक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कमी वेळ आहे पण आतापासूनच कामाला लागा. प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या घरावर काँग्रेसचा झेंडा दिसला पाहिजे. विधान सभा निवडणुकीत कोकणातून काँग्रेसचे उमेदवार विजयी करा आणि कोकणात काँग्रेस नाही असे म्हणणाऱ्यांची तोंडे बंद करा, असेही नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी