शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

CAA: संविधान बदलण्यास भाजपकडून सुरुवात: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:38 AM

आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे.

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत. तसेच हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. तर संविधान  बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने केली असल्याची टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशभर उसळलेल्या जनक्षोभानंतर विरोधी पक्षही यावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे देशभरात याचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. बसपा प्रमुख मायावती, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. तर वेळ पडल्यास रस्तावर उतरण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. तर आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या वतीने 20 डिसेंबर ( शुक्रवारी ) नागरिकत्व कायद्याचा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळावरी खासदार जलील यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात निघणारा मोर्चा सर्वात मोठा असा मोर्चा ठरणार आहे. त्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणारे आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यात सहभाग घ्यावा. तसेच देशात संविधान  बदलण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत असून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने याची सुरवात केली असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला.

भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला फक्त मुस्लिमच नाही तर सर्वच समाजातील लोकं विरोध करत असल्याचे जलील म्हणाले. तर हा मोर्चा कोणत्याही एका समाजासाठी नव्हे तर देशावर आलेल्या संकटाच्या विरोधात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांवर अन्याय करणारे कितीही कायदे आणले तरीही त्याला जनता मान्य करणार नसून, त्याला आम्ही विरोध करणारच असेही जलील म्हणाले.