शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:04 IST

आमदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

Imtiyaz Jaleel on Nitesh Rane : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, अशी उघड धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विविध स्तरातून नितेश राणे यांच्याविषयी निषेध व्यक्त केला जात आहे. 'एमआयएम'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणेंना महत्त्व देऊ नका असं म्हणत जलील यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.

नितेश राणे हे मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलत होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता एमआयएमचे इम्तियाज जलील नितेश राणेंवर टीका केलीय. 

काय म्हणाले नितेश राणे?

पोलीस विभागीतील काही पोलीस अधिकारी हिंदू समाजाच्या लव्ह जिहादाचा विषय आल्यास लवकर केस दाखल करत नाहीत. मुलीच्या पालकांबरोबर गैरव्यवहार करतात. अशा पोलिसांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होतं. अशा सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा देतो. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसले तर अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला. 

"आपण नितेश राणेंना खूप महत्त्व देतोय. महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे जाती जातींचे विभाजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने तिथे  चांगला पोलीस अधिकारी असला असता तर त्याने त्यांच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. तुम्ही अशा प्रकारे द्वेष निर्माण करण्याचे काम करताय आणि मग महाराष्ट्र पोलिसांचे हात बांधलेले आहेत का?," असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

नितेश राणे वक्तव्यावर ठाम "मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास १० ते १५ दिवस केस दाखल करत नाही. काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी," असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस