शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:04 IST

आमदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

Imtiyaz Jaleel on Nitesh Rane : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, अशी उघड धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विविध स्तरातून नितेश राणे यांच्याविषयी निषेध व्यक्त केला जात आहे. 'एमआयएम'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणेंना महत्त्व देऊ नका असं म्हणत जलील यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.

नितेश राणे हे मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलत होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता एमआयएमचे इम्तियाज जलील नितेश राणेंवर टीका केलीय. 

काय म्हणाले नितेश राणे?

पोलीस विभागीतील काही पोलीस अधिकारी हिंदू समाजाच्या लव्ह जिहादाचा विषय आल्यास लवकर केस दाखल करत नाहीत. मुलीच्या पालकांबरोबर गैरव्यवहार करतात. अशा पोलिसांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होतं. अशा सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा देतो. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसले तर अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला. 

"आपण नितेश राणेंना खूप महत्त्व देतोय. महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे जाती जातींचे विभाजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने तिथे  चांगला पोलीस अधिकारी असला असता तर त्याने त्यांच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. तुम्ही अशा प्रकारे द्वेष निर्माण करण्याचे काम करताय आणि मग महाराष्ट्र पोलिसांचे हात बांधलेले आहेत का?," असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

नितेश राणे वक्तव्यावर ठाम "मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास १० ते १५ दिवस केस दाखल करत नाही. काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी," असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस