शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:26 IST

पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा जो दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. 

गोंदिया - हे भ्रष्ट सरकार, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खावेसे वाटतात या सरकारला घालवावं लागेल. जनतेचा निर्धार पाहिला तर संपूर्ण विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात जर तुम्ही सत्तांतर केले, हरियाणात सत्तांतर होणार आहे त्यामुळे केंद्र सरकार फार दिवस टिकणार नाही. मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गोपाल अग्रवाल यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. 

गोंदिया येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न आहेत, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत. यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा जो दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद, या विधानसभेच्या निवडणुकीतही नेत्रदीपक कामगिरी होईल याबद्दल मला काही चिंता नाही. भंडारा-गोंदिया परिसरात नानाभाऊंचे काम हलके झाले. ते राज्यभरात फिरू शकतात आणि या दोन्ही जिल्ह्यात गोपाल अग्रवाल हे मविआच्या आणि काँग्रेसच्या सर्व जागा जिंकून आणतील ही जबाबदारी त्यांची राहील. मी मुख्यमंत्री असताना गोपाल अग्रवाल यांच्यासोबत काम केले आहे. २४ तास गोंदिया मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास, मग विधिमंडळाच्या भाषणातून, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून, मंत्र्यांकडून कामे करून घेण्याची इतकी चिकाटी मी कधी पाहिली नाही. ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते, तिथेही चांगली कामगिरी केली असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, पुढच्या काळात अनेकजण काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. दररोज एक एक नवीन कार्यक्रम होणार आहे. भाजपाचं खरं रुप पाहिलेले आता तिथे राहणार नाही. आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आल्यापासून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरलेले आहे. नानाभाऊ पटेल यांना संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन काँग्रेसला स्फूर्ती आणली आहे. लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा दिल्या. ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता त्यापेक्षाही जास्त जागा विधानसभेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे मला माहिती नाही, पण महायुतीला १०० जागाही मिळणार नाहीत. गेली १० वर्ष चालत आलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात असंही ते म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४