शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 12:03 IST

भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे..

ठळक मुद्देसमस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना

पुणे : भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे. सेनेवर भारतवासियांनी विश्वास ठेवल्यास सैन्याला बळ मिळेल. मुंबई हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले असते तर उरी व पठाणकोट हल्ले झाले नसते. स्ट्राईकने आपल्यावरील हल्ले पूर्णपणे थांबतीलच असे नाही. मात्र, आपली सेना शक्तीशाली आहे, हे दिसेल, असे मत सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी केले.समस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन बाजीराव रस्त्याजवळील नातूबाग मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ‘हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले’ पुरस्काराने राजेंद्र्र निंभोरकर यांना गौरविण्यात आले. तसेच ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराने संजय शर्मा यांना आणि मुकेश पाटील, सचिन पाटील यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, मिलिंद एकबोटे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, अ‍ॅड. मोहन डोंगरे, दीपक नागपुरे,तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, संदीप महाराज पळसे, मनोज पवार, कृष्णाजी पाटील, संजय जढर, सचिन जामगे आदी उपस्थित होते. राजेंद्र निंभोरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा काळोख्या रात्री हल्ले करुन गड-किल्ले मिळविले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकमध्ये देखील अमावस्येची किंवा काळोखी रात्र हीच आम्हा सैनिकांची मैत्रीण असते. भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. भारत सरकारने सैन्याला पूर्ण मुभा व साहित्य दिल्याने आम्ही सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करु शकलो, असे सांगताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे इतरही अनुभव सांगितले.पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, भारतात इतिहासाचे लेखन नीट केले गेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० झाली. मात्र, राष्ट्र म्हणून आज ओळख मिळू लागली आहे. काश्मिरमध्ये ३७०, ३५अ कलम काढल्यानंतर खºया अर्थाने देश एकत्र झाला. यापूर्वी देश एकत्रितपणे उभा राहिला असता, तर काश्मिरी हिंदू पंडितावर अन्याय झाला नसता. मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण करताना अयोध्या आंदोलनाला यश येऊन राम मंदिर निर्माण होणार याचा आनंद यंदाच्या शिवप्रताप दिनाच्या उत्सवात आहे. मात्र, प्रतापगडच्या पायथ्याशी आजही अफजलखानाची कबर आहे. त्यामुळे आता ही कबर काढून शिवप्रताप स्मारक उभारण्याकरीता आपण पुढे येऊ या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर रंगराव पाटील व सहकाºयांनी पोवाडा सादर केला. तर, तुकाराम चिंचणीकर यांनी शिवरायांची आरती सादर केली. सौरभ कर्डे यांनी अफजलखान वधाचा प्रसंग सांगितला. नंदकिशोर एकबोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणेsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद