शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

अध्यादेश मंजूर झाल्यास न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:14 AM

खुल्या वर्गातील पालकांची भूमिका । मराठा पदव्युत्तर प्रवेशाला विरोध

मुंबई : सुमारे अडीचशे मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशनिश्चितीसाठी राज्य सरकारने अध्यादेश जाहीरकेला असला, तरी खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी या विद्यार्थी आणि पालकांनी शनिवारी धरणेही दिले. मात्र, तेथे कोणताही नेता फिरकला नाही. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप करीत जर लागू झाल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका पालकांनी घेतली आहे.

सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केल्यास मराठा आरक्षणाचे प्रवेश निश्चित होऊन खुल्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या जागा कमी होणार आहेत. विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या जागा या गुणवत्तेवर नाही, तर आरक्षणावर मिळणार असल्याने त्याला आमचा विरोध असल्याचे पालक सुद्धा शेणॉय यांनी म्हटले. त्यामुळे सरकारने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

जर अध्यादेश लागू झालाच, तर आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली असल्याची माहिती शेणॉय यांनी दिली. न्यायालयीन प्रक्रियेत गरज भासल्यास आपण अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मदत घेऊ अशी, प्रतिक्रिया खुल्या वगार्तील पालकांनी व्यक्त केली आहे.अ‍ॅड. सदावर्ते यांचे राज्यपालांना पत्रवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत खुल्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मराठा विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही कारण्यापूर्वी सदावर्ते यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. कलम २१३ च्या अधिकाराचा वापर करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घ्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या अध्यादेशावर सही करू नये आणि पुनर्विचारासाठी निर्णय राज्य सरकारकडे परत पाठवावा, अशी मागणी सदावर्ते यांनी पत्रात केली आहे. याआधीही मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण