शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

OBC Reservation: “...तर मी राजीनामा देतो”; काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 6:07 PM

खोटं बोलून विरोधक जनतेची दिशाभूल करतायेत. तत्कालीन सरकारने पाठवलेले ६ पानी पत्र हे ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे असं त्यांनी सांगितले.

मुंबई – ओबीसी आरक्षणावरुन सध्या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका जाहीर झाल्याने विरोधकांनी सरकारला टार्गेट केले आहे. ओबीसी मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवारांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देतो असं मोठं विधान केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका होत आहेत त्याला काँग्रेस नाही तर भाजपा जबाबदार आहे. विरोधक सांगतायेत महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार आहे परंतु तसं नाही. खोटं बोलून विरोधक जनतेची दिशाभूल करतायेत. तत्कालीन सरकारने पाठवलेले ६ पानी पत्र हे ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. मात्र उद्या याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मुद्दा आला तर तिथे ओबीसी समुदायातील माणूस हवा. परंतु सर्वांनीच ठरवलं तर येणाऱ्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच होतील. या ५ जिल्ह्यातील पोटनिवडणुकांवर जोकाही गोंधळ सुरू आहे. तो केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी आहे. त्यापलीकडे काही नाही. त्यामुळे राज्यतील जनता योग्य तो निर्णय घेईल असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

OBC आरक्षणाची गुंतागुंत वाढण्यास भाजपा जबाबदार

मराठा व ओबीसी आरक्षणाची गुंतागुत वाढण्यास तत्कालीन फडणवीस सरकार व भाजपा जबाबदार आहेत. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांना नसतानाही फडणवीस सरकारने या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणाचा ठराव पास करुन घेतला. मात्र सुप्रीम कोर्टात तो रद्द झाला. ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात येण्यासही फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. 

त्याशिवाय १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांचे अधिकार गेले आहेत हे चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी मान्यच केले नाही. हे करत असताना १२७ वी घटना दुरुस्ती केली. त्यानंतर कोर्टाच्या निकालानंतर ही घटना दुरुस्ती करुन पुन्हा राज्य सरकारांना आरक्षणाचे अधिकार बहाल केले पण त्यात आणखी एक मेख मारली ती ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न वाढवता तशीच ठेवली, असे अतुल लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाcongressकाँग्रेस