"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:40 IST2025-09-25T10:39:28+5:302025-09-25T10:40:34+5:30

Marathwada Flood Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

"If money cannot be disguised, will the government allow farmers to End Life?", Vijay Vadettiwar asked | "पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

नागपूर - मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,  अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहेत. पण हा केवळ देखावा आहे. किती मदत देणार सांगावे असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेलं आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवाबनवी सरकार करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केल्यावर वित्तमंत्री अजित पवार का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू, ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही, ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे. मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर कीड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्यांचं आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे, असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.

Web Title : सरकार किसानों की उपेक्षा कर रही, आत्महत्या के लिए मजबूर: विजय वडेट्टीवार का हमला

Web Summary : विजय वडेट्टीवार ने मराठवाड़ा में भारी नुकसान के बाद किसान ऋण माफी पर सरकार की निष्क्रियता की आलोचना की। उन्होंने सरकार की प्राथमिकताओं पर सवाल उठाया, तत्काल सहायता का आग्रह किया और फसल और भूमि क्षति के लिए अधिक मुआवजे की मांग की। वडेट्टीवार ने सीएम राहत कोष में छह महीने का वेतन देने का संकल्प लिया।

Web Title : Government neglecting farmers, pushing them to suicide: Vijay Wadettiwar slams government.

Web Summary : Vijay Wadettiwar criticizes the government for its inaction on farmer loan waivers after heavy losses in Marathwada. He questions the government's priorities, urging immediate aid and demanding increased compensation for crop and land damage. Wadettiwar pledged six months of his salary to the CM relief fund.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.