शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:55 IST

Sanjay Nirupam: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्मावरील विधानावर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली.

Sanjay Nirupam on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुनच आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निरुपम यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते.' निरुपम यांनी सनातनला भारताची सभ्यता आणि संस्कृतीचे रक्षक असे वर्णन केले आहे.

काय म्हणाले संजय निरुपम ?

संजय निरुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली आहे. जर सनातन नसता, तर हा देश खूप पूर्वी सौदी अरेबिया झाला असता. अशा धर्माला 'दहशतवादी' म्हणणे म्हणजे कृतघ्नता आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांना सनातनच्या सावलीत आश्रय मिळाला होता,' अशी टीका निरुपम यांनी केली.

काय म्हणाले होते आव्हाड ?शनिवारी (२ ऑगस्ट) एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले की, 'सनातन धर्मासारखे काहीही कधीच अस्तित्वात नव्हते. ही एक विचारसरणी आहे, ज्याने भारताला उद्ध्वस्त केले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, कोणत्याही तथाकथित सनातन धर्माचे नाही. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा आणला आणि संभाजी महाराजांची बदनामी केली. ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि माती फेकण्यात आली. शाहू महाराजांच्या हत्येचा कट सनातन धर्म रचत होता,' अशी वादग्रस्त टीका आव्हाड यांनी केली होती.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Nirupamसंजय निरुपमNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSanatan Sansthaसनातन संस्था