शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:55 IST

Sanjay Nirupam: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्मावरील विधानावर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली.

Sanjay Nirupam on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुनच आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निरुपम यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते.' निरुपम यांनी सनातनला भारताची सभ्यता आणि संस्कृतीचे रक्षक असे वर्णन केले आहे.

काय म्हणाले संजय निरुपम ?

संजय निरुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली आहे. जर सनातन नसता, तर हा देश खूप पूर्वी सौदी अरेबिया झाला असता. अशा धर्माला 'दहशतवादी' म्हणणे म्हणजे कृतघ्नता आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांना सनातनच्या सावलीत आश्रय मिळाला होता,' अशी टीका निरुपम यांनी केली.

काय म्हणाले होते आव्हाड ?शनिवारी (२ ऑगस्ट) एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले की, 'सनातन धर्मासारखे काहीही कधीच अस्तित्वात नव्हते. ही एक विचारसरणी आहे, ज्याने भारताला उद्ध्वस्त केले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, कोणत्याही तथाकथित सनातन धर्माचे नाही. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा आणला आणि संभाजी महाराजांची बदनामी केली. ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि माती फेकण्यात आली. शाहू महाराजांच्या हत्येचा कट सनातन धर्म रचत होता,' अशी वादग्रस्त टीका आव्हाड यांनी केली होती.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Nirupamसंजय निरुपमNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSanatan Sansthaसनातन संस्था