शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

परिपूर्ण आयुष्य जगलो, निरपेक्ष जगलो, जगाने उचलून धरले- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:06 IST

प्रख्यात समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुलाखत घेतली.

जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीमागे आहे याचा अनुभव येईल, हे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. तुम्ही तुमचे काम सुरू करा, लोक आपोआप तुमच्या मागे येत जातात, असेही ते म्हणायचे. आम्ही त्यांनी दिलेल्या याच आदर्शावर वाटचाल केली. भामरागडसारख्या आदिवासीबहुल भागात काम करत राहिलो. आदिवासींकडून अनेक गोष्टी शिकलो, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.

आदिवासी संस्कृतीत आभार हा शब्दच नाही, हे सांगताना डॉ. आमटे यांनी सुरुवातीच्या काळात आलेला अनुभव सांगितला. एके दिवशी चार ते पाच आदिवासी एका आजारी असलेल्या आदिवासीला खाटेवर घेऊन त्यांच्याकडे आले. ती व्यक्ती गंभीर आजारी होती. बरी होईल की नाही याची शाश्वतीही नव्हती. बरोबर आलेले लोक त्या व्यक्तीला खाटेसह तिथेच सोडून निघून गेले. डॉ. आमटेंनी केलेल्या उपचारानंतर सात-आठ दिवसांनी ती व्यक्ती ठणठणीत बरी झाली. त्यानंतर ती व्यक्ती ज्या खाटेवरून आली होती, तीच खाट खांद्यावर उचलून घरी गेली. पण त्यावेळी त्या व्यक्तीने आमटेंचे आभारही मानले नाहीत. "आपण आपले काम करत राहावे, कुणाकडून अपेक्षा करू नये, हे आदिवासी संस्कृतीतून शिकलो", असे आमटे म्हणाले.

उक्ती आणि कृती यात विसंगती नसावीआमटे म्हणाले, उक्ती आणि कृती यात विसंगती नसावी. बाबा तसेच वागायचे. आम्हीही त्यांचे अनुकरण केले. त्यामुळेच आमच्या मुलांनाही आमच्या वागण्या-बोलण्यात कुठे विसंगती आढळली नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावरही झाला. मोठा मुलगा आणि सून वैद्यकीय सेवा निष्ठेने सांभाळतात, तर छोटा मुलगा आणि सून शाळांची जबाबदारीने योग्यरीतीने सांभाळतात.

'नवी पिढी नव्या वाटा' कशासाठी?आनंदवनात आमची तिसरी पिढी काम करत आहे. आम्ही आमच्या परीने काम करत राहिलो. आमच्या पुढच्या पिढीने ते कार्य पुढे नेले. आम्ही केलेल्या कामापेक्षा ते काम अधिक वेगळे आहे. त्याची माहिती लोकांना व्हावी, यासाठी 'नवी पिढी नव्या वाटा' हे पुस्तक लिहिले. आम्ही सगळ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहिलो, दूर राहिलो, साधेपणा जपला.

टॅग्स :Tejashree Pradhanतेजश्री प्रधान