शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:46 IST

Uddhav Thackeray देशातील काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांत दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) मणिपूर आणि काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्याने घेणार माहिती नाही. आता तरी मोदी मणिपूरला जाणार का असा सवाल करत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मणिपूरवर १ वर्षाने मोहन भागवत बोलले, मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का? कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असं जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत. काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर  देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं असा टोला ठाकरेंनी लगावला. 

तर अनिल परब यांनी माझा पदवीधर मतदार म्हणून उल्लेख केला त्यामुळे माझी पदवी खरी असल्याचं सिद्ध झालं असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींना चिमटा काढला. पदवीधर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी नेतृत्व केले होते. सुशिक्षित मतदारांचे वेगळे प्रश्न असतात. पदवी मिळाल्यावर पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. पदवीधरांसाठी काही वचने अनिल परब यांनी दिली आहे. गेली ५ टर्म मतांच्या रुपाने मुंबईकर शिवसेनेला आशीर्वाद देतायेत. शिवसेना-मुंबईकर या नात्याला आणखी मजबूत करून आजपर्यंत जसं पाठीशी उभे राहिला तसं यावेळीही उभे राहाल ही अपेक्षा आहे. २६ जूनला कार्यालयात जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन कामाला जावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पदवीधरांना केले. 

महाविकास आघाडीत बिघाडी नाही

दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं,कारण मी निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझौता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

कोकणच्या जागेवर ठाकरे गट माघार घेणार 

नाशिक पदवीधर ही आमची सिटिंग जागा आहे. आमचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असला तरी त्या जागेवर फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. कोकणची जागा काँग्रेसला मिळतेय. काल रात्री चर्चा झाली. त्यात नाना पटोलेही सहभागी होते. प्रत्येक चर्चेत उद्धव ठाकरेंना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार पक्षात काम करतो. ते पक्षाचे प्रमुख आहेत. कोकणच्या जागेवर आम्ही माघार घेतोय. नाशिकच्या जागेवर काँग्रेसनं माघार घ्यावी असं ठरलं आहे. चारही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक