शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:46 IST

Uddhav Thackeray देशातील काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांत दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) मणिपूर आणि काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्याने घेणार माहिती नाही. आता तरी मोदी मणिपूरला जाणार का असा सवाल करत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मणिपूरवर १ वर्षाने मोहन भागवत बोलले, मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का? कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असं जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत. काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर  देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं असा टोला ठाकरेंनी लगावला. 

तर अनिल परब यांनी माझा पदवीधर मतदार म्हणून उल्लेख केला त्यामुळे माझी पदवी खरी असल्याचं सिद्ध झालं असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींना चिमटा काढला. पदवीधर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी नेतृत्व केले होते. सुशिक्षित मतदारांचे वेगळे प्रश्न असतात. पदवी मिळाल्यावर पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. पदवीधरांसाठी काही वचने अनिल परब यांनी दिली आहे. गेली ५ टर्म मतांच्या रुपाने मुंबईकर शिवसेनेला आशीर्वाद देतायेत. शिवसेना-मुंबईकर या नात्याला आणखी मजबूत करून आजपर्यंत जसं पाठीशी उभे राहिला तसं यावेळीही उभे राहाल ही अपेक्षा आहे. २६ जूनला कार्यालयात जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन कामाला जावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पदवीधरांना केले. 

महाविकास आघाडीत बिघाडी नाही

दरम्यान, महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं,कारण मी निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझौता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

कोकणच्या जागेवर ठाकरे गट माघार घेणार 

नाशिक पदवीधर ही आमची सिटिंग जागा आहे. आमचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असला तरी त्या जागेवर फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. कोकणची जागा काँग्रेसला मिळतेय. काल रात्री चर्चा झाली. त्यात नाना पटोलेही सहभागी होते. प्रत्येक चर्चेत उद्धव ठाकरेंना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार पक्षात काम करतो. ते पक्षाचे प्रमुख आहेत. कोकणच्या जागेवर आम्ही माघार घेतोय. नाशिकच्या जागेवर काँग्रेसनं माघार घ्यावी असं ठरलं आहे. चारही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक