शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:29 IST

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: मला क्लीनचीट मिळाली तेव्हा मी ठाकरे-पवारांना पेढेही दिले होते, असेही भुजबळ म्हणाले

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: ईडीच्या कारवाईपासून सुटका मिळण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाला आणि ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता असे छगन भुजबळ म्हणाले, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. या आरोपांवर आज भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

"मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटकेसाठी आम्ही भाजपासोबत गेलो किंवा महायुतीत आलो असा आरोप आमच्यावर आधीपासून होतोय. कोर्टाने मला उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं तेव्हाच 'महाराष्ट्र सदन' प्रकरणात क्लीन चीट दिलेय. कोर्टाचा निकाल आल्यावर मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले आहेत. त्यामुळे मला तुरुंगात जाण्याची भीती आहे या सगळ्या गोष्टींचा मी इन्कार करतो", अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ईडी आणि महायुतीसंदर्भात वक्तव्य केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, राजदीप सरदेसाई यांचे '२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया' हे पुस्तक काही दिवसांनी वाचेन, माझ्या वकिलांनाही देईन आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करेन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

"५४ जणांच्या सह्यांचे पत्र आमच्याकडे होते. त्या ५४ जणांवर ईडीच्या केसेस नव्हत्या. याबाबत आम्ही आधीही सांगितलं आहे. आम्ही राज्यातील विविध भागांचा विकास व्हावा यासाठी निर्णय घेतला होता. आम्ही जो निर्णय घेतला त्याचा आम्हाला जनतेच्या विकासकामांसाठी नक्कीच फायदा झाला. या साऱ्या प्रकरणात ओबीसी किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा इथे कुठलाही संबंध नाही," असेही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. 

भुजबळ काय म्हणाले?

पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले, "मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही."

"मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली," असे भुजबळ म्हणाले असल्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाMahayutiमहायुतीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय