शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:29 IST

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: मला क्लीनचीट मिळाली तेव्हा मी ठाकरे-पवारांना पेढेही दिले होते, असेही भुजबळ म्हणाले

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: ईडीच्या कारवाईपासून सुटका मिळण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाला आणि ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता असे छगन भुजबळ म्हणाले, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. या आरोपांवर आज भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

"मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटकेसाठी आम्ही भाजपासोबत गेलो किंवा महायुतीत आलो असा आरोप आमच्यावर आधीपासून होतोय. कोर्टाने मला उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं तेव्हाच 'महाराष्ट्र सदन' प्रकरणात क्लीन चीट दिलेय. कोर्टाचा निकाल आल्यावर मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले आहेत. त्यामुळे मला तुरुंगात जाण्याची भीती आहे या सगळ्या गोष्टींचा मी इन्कार करतो", अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ईडी आणि महायुतीसंदर्भात वक्तव्य केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, राजदीप सरदेसाई यांचे '२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया' हे पुस्तक काही दिवसांनी वाचेन, माझ्या वकिलांनाही देईन आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करेन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

"५४ जणांच्या सह्यांचे पत्र आमच्याकडे होते. त्या ५४ जणांवर ईडीच्या केसेस नव्हत्या. याबाबत आम्ही आधीही सांगितलं आहे. आम्ही राज्यातील विविध भागांचा विकास व्हावा यासाठी निर्णय घेतला होता. आम्ही जो निर्णय घेतला त्याचा आम्हाला जनतेच्या विकासकामांसाठी नक्कीच फायदा झाला. या साऱ्या प्रकरणात ओबीसी किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा इथे कुठलाही संबंध नाही," असेही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. 

भुजबळ काय म्हणाले?

पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले, "मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही."

"मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली," असे भुजबळ म्हणाले असल्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाMahayutiमहायुतीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय