शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

बारावीचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:53 AM

अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे.

पुणे : अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तज्ज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून १० मे २०१९ पर्यंत आॅनलाइन सूचना, शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येतील.महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना व त्यास अनुसरून नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची मांडणी ही नव्याने क्षमता विधानांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. अकरावीचा विचार करता विषयाचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. बारावीसाठी विषयाचे उपयोजनात्मक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्याचा अवलंब करावा हा विचार ठेवण्यात आलेला आहे.अभ्यासक्रमाची मांडणी ही क्षमता विधानांच्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असल्याचे बालभारतीने म्हटले आहे. फक्त विषयज्ञानात भर घालण्यापेक्षा त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमांबाबत शिफारशी, सूचना पाठविण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र