शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग, ईडीचे विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:13 IST

हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय होते. बेकायदेशीररित्या मिळालेले पैसे देणगी स्वरुपात दाखवण्यासाठी हृषीकेश यांनी त्यांच्या वडिलांना मदत केली, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हृषीकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली आहे. 

हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत. हृषीकेश देशमुख यांच्या वडिलांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेद्वारे बार व रेस्टाॅरंट्सकडून वसुली केलेल्या ४.७० कोटी रुपयांतील काही पैसे हवालाद्वारे त्यांच्या सहकाऱ्याकडे वळते केले आणि तेच पैसे ट्रस्टला देण्यात आलेली देणगी म्हणून दाखविण्यात आले,  असे ईडीने न्यायालयात सादर केलेल्या  प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हृषीकेश देशमुख यांनी कुटुंबीयांबरोबर मिळून ‘कॉम्प्लेक्स वेब’ अशी कंपनी स्थापली आणि याच कंपनीच्या खात्यावरून संशयित व्यवहार करण्यात आला आहे. सहा वेळा समन्स बजावूनही हृषीकेश देशमुख तपासाला सहकार्य करत नाही, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर हृषीकेश देशमुख यांनी ईडी चुकीच्या हेतूने कारवाई करत असल्याचे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. पोलीस दल ‘जमीनदारी पद्धती’चा भाग नाही; सीबीआयचा हायकोर्टात युक्तिवाद

- राज्याचे पोलीस दल ही एक स्वतंत्र संस्था असून ती कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणापासून मुक्त असायला हवी. पोलीस दल हे कोणत्याही ‘जमीनदारी पद्धतीचा’ भाग असू नये, असा युक्तिवाद सीबीआयने राज्य सरकारच्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या समन्सविरोधात केलेल्या याचिकेवर आक्षेप घेताना उच्च न्यायालयात सोमवारी केला.

- भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासासंदर्भात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे केला.

- या प्रकरणी राज्य सरकारच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासात ढवळाढवळ करणे, हेच राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. देशमुख गृहमंत्री असताना सुबोध जयस्वाल हे राज्याचे पोलीस संचालक होते. पोलीस बदल्या व नियुक्त्यांबाबतच्या बैठकांमध्ये ते उपस्थित होते. जायस्वाल यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर तपासात तडजोड झाली, हा राज्य सरकारचा दावा लेखी यांनी फेटाळला.- पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डाचे सदस्य या नात्याने जयस्वाल त्या बैठकींना उपस्थित होते. प्रश्न हा आहे की, जे घडले ते जयस्वाल यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे घडले की गृहमंत्र्यांच्या वर्तनामुळे घडले? गुन्ह्यातील देशमुख यांचा सहभाग आणि देशमुखांच्या माणसांनी घेतलेली खंडणी, यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे, असे लेखी यांनी न्यायालयाला सांगितले. या याचिकेवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस