शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग, ईडीचे विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:13 IST

हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय होते. बेकायदेशीररित्या मिळालेले पैसे देणगी स्वरुपात दाखवण्यासाठी हृषीकेश यांनी त्यांच्या वडिलांना मदत केली, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हृषीकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली आहे. 

हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत. हृषीकेश देशमुख यांच्या वडिलांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेद्वारे बार व रेस्टाॅरंट्सकडून वसुली केलेल्या ४.७० कोटी रुपयांतील काही पैसे हवालाद्वारे त्यांच्या सहकाऱ्याकडे वळते केले आणि तेच पैसे ट्रस्टला देण्यात आलेली देणगी म्हणून दाखविण्यात आले,  असे ईडीने न्यायालयात सादर केलेल्या  प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हृषीकेश देशमुख यांनी कुटुंबीयांबरोबर मिळून ‘कॉम्प्लेक्स वेब’ अशी कंपनी स्थापली आणि याच कंपनीच्या खात्यावरून संशयित व्यवहार करण्यात आला आहे. सहा वेळा समन्स बजावूनही हृषीकेश देशमुख तपासाला सहकार्य करत नाही, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर हृषीकेश देशमुख यांनी ईडी चुकीच्या हेतूने कारवाई करत असल्याचे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. पोलीस दल ‘जमीनदारी पद्धती’चा भाग नाही; सीबीआयचा हायकोर्टात युक्तिवाद

- राज्याचे पोलीस दल ही एक स्वतंत्र संस्था असून ती कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणापासून मुक्त असायला हवी. पोलीस दल हे कोणत्याही ‘जमीनदारी पद्धतीचा’ भाग असू नये, असा युक्तिवाद सीबीआयने राज्य सरकारच्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या समन्सविरोधात केलेल्या याचिकेवर आक्षेप घेताना उच्च न्यायालयात सोमवारी केला.

- भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासासंदर्भात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे केला.

- या प्रकरणी राज्य सरकारच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. भ्रष्टाचारप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासात ढवळाढवळ करणे, हेच राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. देशमुख गृहमंत्री असताना सुबोध जयस्वाल हे राज्याचे पोलीस संचालक होते. पोलीस बदल्या व नियुक्त्यांबाबतच्या बैठकांमध्ये ते उपस्थित होते. जायस्वाल यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर तपासात तडजोड झाली, हा राज्य सरकारचा दावा लेखी यांनी फेटाळला.- पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डाचे सदस्य या नात्याने जयस्वाल त्या बैठकींना उपस्थित होते. प्रश्न हा आहे की, जे घडले ते जयस्वाल यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे घडले की गृहमंत्र्यांच्या वर्तनामुळे घडले? गुन्ह्यातील देशमुख यांचा सहभाग आणि देशमुखांच्या माणसांनी घेतलेली खंडणी, यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे, असे लेखी यांनी न्यायालयाला सांगितले. या याचिकेवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस