शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

सांगा शिकायचे तरी कसे ? ५७ टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:48 AM

एकीकडे सर्व शिक्षा अभियानासारख्या विविध उपक्रमांतर्गत समाजाच्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मुंबई : एकीकडे सर्व शिक्षा अभियानासारख्या विविध उपक्रमांतर्गत समाजाच्या तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे राज्यभरात कमी पटसंख्या असलेल्या आणि गुणवत्ता नसलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातच शिक्षक हक्क कायद्यांतर्गत सुरू असलेल्या शाळांमध्येच सरकार नियमांचे पालन करत नसल्याचे उघड झाले आहे. ५७ टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याचे बाल हक्क अभियानाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. पूर्णवेळ मुख्याध्यापकांअभावी कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे सांगा कसे शिकायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये गरजू, वंचित बालकांना शिक्षण दिले जाते. पण शाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जण खासगी शाळांकडे वळत आहेत. बाल हक्क अभियानातर्फे ८ जिल्ह्यांतील पहिली ती आठवीच्या १२२ शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात मुंबईतील ८ महापालिकेच्या शाळा सोडता अन्य सर्व शाळा या जिल्हा परिषदेच्या होत्या.ज्या शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही, अशा शाळांची गुणवत्ता कशी सुधारणार, असा प्रश्न बाल हक्क अभियानातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.शिक्षक, विद्यार्थीच करतात शौचालयांची स्वच्छता-या सर्वेक्षणात आढळून आलेली एक चांगली बाब म्हणजे शाळांमध्ये शौचालय बांधणी झाली आहे अथवा शौचालय बांधणीचे काम सुरू आहे. पण दुसरीकडे असे दिसून आले की, ६९ टक्के शाळांमध्ये शौचालयाची स्वच्छता ही शिक्षक अथवा विद्यार्थीच करतात, तर फक्त १२ टक्के शाळांमध्ये शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी आहेत. ६३ टक्के शाळांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी कोणतीही सोय नाही, तर ३४ टक्के शाळांमध्ये मुलांना खेळायला मैदान उपलब्ध नाही.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी