शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

By admin | Updated: February 21, 2015 22:44 IST

विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला.

शिरूर : विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाले’त दाभोलकर ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची वाटचाल’ या विषयावर बोलत होत्या. तहसीलदार रघुनाथ पोटे अध्यक्षस्थानी होते. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, माजी नगरसेवक संपतलाल नहार, राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष संतोष मोरे, जीवन विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका शकुंतला रसाळ आदी विचार मंचावर उपस्थित होते. दाभोलकर म्हणाल्या, ‘‘फुले, शाहू, आंबेडकरांची जी परंपरा आपण सांगतो त्या परंपरेतून लोकांच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न विवेकी दृष्टिकोनातून हाताळण्याची एक समाजप्रबोधनाची सक्षम परंपरा महाराष्ट्रात रुजलेली आहे. या परंपरेचा विचार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी राहिली आहे. १९८९ ला सुरू झालेल्या या चळवळीतून गेल्या २५ वर्षांत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ७०० ते ८०० बुवा-बाबांचे धंदे बंद पाडण्यात चळवळीला यश आले आहे.’’ डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जादूटोणा कायदा अमलात यावा, यासाठी १८ वर्षे लढा दिला. मात्र, हा कायदा विशिष्ट धर्माच्याविरोधात असल्याचा अपप्रचार केला गेला. या अपप्रचाराची मोठी किंमत डॉ. दाभोलकरांना मोजावी लागली. याची खंत मुक्ता दाभोलकरांनी व्यक्त केली. अंधश्रद्धा या विकासविरोधी असून, त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे सांगून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘श्रद्धा उन्नत व मानवकेंद्रित केली तर समाज बदलू शकेल व अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकेल.’’ जयंती उत्सव समितीचे प्रमुख रवींद्र धनक, घोडगंगा कारखान्याचे संचालक पांडुरंगअण्णा थोरात, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, समितीचे अ‍ॅड़ ओमप्रकाश सतिजा, विक्रम पाटील, सतीश गवारी, प्रा. दत्ता शिंदे, मंगेश खांडरे, संजय बांडे, अनिल बांडे, संजय कौठाळे, चाँदभाई बळबट्टी, रामा इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वजिफा शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समाजमनात भीती असणे घातक ४समाजात विचार मांडणाऱ्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होणे ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ही भावना नष्ट होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. चार्ली हॅब्दोवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यातील मारेकऱ्यांना त्या सरकारने ४८ तासांत जेरबंद केले. आपले सरकार मारेकरी पकडण्यात अपयशी ठरत असल्याची खंत दाभोलकरांनी व्यक्त केली. ४महाराष्ट्रातून कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न करून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘सरकारने डॉ. दाभोलकर व पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात आता तरी तत्परता दाखवावी.’’