शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आयटीत तरतूद ३२५ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?; भाजपाचा संजय राऊतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:45 IST

दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात.

मुंबई : राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३५५ कोटी ८६ लाख रुपयांचीच तरतूद झाली. मग या खात्यात २५ हजार कोटींचे घोटाळे कुठून झाले, असा प्रश्न तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान महामंडळामार्फत विविध शासकीय विभागांची ७२४ कोटी रुपयांची कामे या काळात करण्यात आली.

दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात. त्या-त्या वर्षी करण्यात आलेली तरतूद आणि खर्चाचा तपशील ऑन रेकॉर्ड आहे, याकडे या विभागाचे तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ३५६ कोटींची तरतूद अन् घोटाळे २५ हजार कोटींचे हे न समजण्यासारखे आहे. खासदार संजय राऊत हे आधी मनोरंजन करायचे, आता हवा‘बाण’ सोडत आहेत. कायद्याच्या कसोटीवर असे बेताल आरोप टिकणार नाहीत. 

टॅग्स :BJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत