शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 14:19 IST

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही.

ठळक मुद्देड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने नेले काळाच्या पडद्याआड गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात केला दौरा

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसदलाचा कुटूंबप्रमुख या नात्याने जास्तीत जास्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे. गृहमंत्र्यांच्या 'होम मिनिस्टर' असणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी देखील याच पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्या बोलतात ते पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींशी...होय, दररोज राज्यातल्या किमान वीस पोलिस पत्नींशी त्या संवाद साधतात.

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. गृहमंत्र्यांंच्याच पत्नी बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र पोलिस पत्नींच्या भावना अनावर होतात. आपुलकीने आणि वडीलधाऱ्याच्या मायेने आरती देशमुख बोलू लागतात तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याची पत्नी भारावून जाते आणि फोन संपेपर्यंत आत्मविश्वासाने भरून जाते.    

कोरोनाच्या संकटाने ड्युटीवर असणाऱ्या राज्यातल्या 87 पोलिसांना आजवर कोरोनाने काळाच्या पडद्याआड नेले आहे. शेकडो पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ड्युटीवर जाणाऱ्या घरातल्या कर्त्या माणसाबद्दल घरच्यांना काळजी लागून राहते. आरती देशमुख यांनी 'लोकमत'ला सांगितले, ''गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कोरोना काळात राज्यात 28 जिल्ह्यात दौरा केला. शेकडो लोकांना ते भेटतात. रुग्णालयांमध्ये जातात. अशावेळी पत्नी म्हणून माझ्या मनातही सतत काळजी असते. त्यामुळेच ज्यांच्या घरातील माणूस ड्युटीवर आहे त्यांच्या मनात काय भावना येत असतील याची कल्पना मी करु शकते. यातूनच मला वाटलं की आपण पोलिसांच्या घरातल्या महिलांशी बोललं पाहिजे. त्यांना धीर दिला पाहिजे. याच भावनेतून मी रोज जास्तीत जास्त पोलिसांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.'' 

 माझा फोन गेल्यानंतर बहुतेक जणींच्या भावना अनावर होतात. त्यांना रडू कोसळते. ड्युटीवर असणाऱ्याबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलाबाळांना देखील नीट जवळ घेता येत नाही. ड्युटीवर असताना कुठून संसर्ग होईल याची धास्ती त्यांना असते. आपल्यामुळे माझ्या घरच्यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीही काळजी त्यांच्या मनात असते. कोरोनानं जीवनच बदलून गेल्याचे त्या सांगतात, असा अनुभव आरती देशमुख यांनी सांगितला. त्यावर मी त्यांना दिलासा देते. तुम्ही एकट्या नाहीत. सरकार, समाज तुमच्या पाठीशी आहे, हे सांगते. यातून त्यांची उमेद वाढते असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस