शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालये सामान्यांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी, मुंबई उच्च न्यायालयातील सत्कार समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:45 IST

Chief Justice Suryakant News: उच्च न्यायालये सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची केवळ पायरी नाहीत, सामान्य नागरिकांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी म्हणजे उच्च न्यायालये आहेत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले.

मुंबई - उच्च न्यायालये सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची केवळ पायरी नाहीत, सामान्य नागरिकांच्या दारात उभा असलेला प्राथमिक पहारेकरी म्हणजे उच्च न्यायालये आहेत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम शब्द असू शकतो, पण अनेकदा सर्वात महत्त्वाचा शब्द उच्च न्यायालयाचाच असतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

कायदा मौन असताना पहारेकरी गप्प बसत नाही. पर्यावरणाचे संरक्षण, कैद्यांसह प्रत्येक मानवाचा सन्मान जपणे, तसेच राष्ट्रीय संकटाच्या काळात स्थलांतरित कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्देशांचे आपण साक्षीदार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उशिरा मिळणारा न्याय म्हणजे न्यायाचा नाशकायद्याच्या अपयशाबाबत उच्च न्यायालयांनी अधिक सक्रिय व सजग राहावे. उशिरा मिळणारा न्याय म्हणजे केवळ न्याय नाकारणे नव्हे, तर न्यायाचा नाश होय, असे ठाम मत सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ विधीज्ञ फली नरिमन स्मृती व्याख्यानादरम्यान मांडले. तसेच मध्यस्थी व सलोखा यासारख्या यंत्रणांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दोषसिद्धी दर वाढवू : उपमुख्यमंत्री शिंदेराज्याचा दोषसिद्धी दर ९ वरून ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी कोल्हापूरच्या बहुप्रतिक्षित सर्किट बेंचला पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती शिंदे यांनी सरन्यायाधीशांकडे केली.

मुंबई उच्च न्यायालय ही संस्कृतीमुंबई उच्च न्यायालयाच्या प्रांगणात वेळ घालवलेल्या प्रत्येकासाठी मुंबई उच्च न्यायालय एक संस्कृती आहे. जिथे वकिली तीक्ष्ण असते, पण शिस्तबद्ध; जिथे मतभेद असले तरी ते अवमानात परिवर्तित होत नाहीत, असे गौरवद्गार सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : High Courts: First line of defense for citizens, says CJI Suryakant.

Web Summary : Chief Justice Suryakant emphasizes High Courts as primary protectors of citizens' rights. He highlighted their role in environmental protection, human rights, and migrant worker welfare. He urged proactive action against delayed justice. The state aims to raise the conviction rate, said Deputy CM Shinde.
टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट