शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट कुपोषण बळींवरून हायकोर्ट सरकारवर नाराज; ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:00 IST

बाल मृत्यूच्या समस्येवर मात कशी करणार ते सांगा: कोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मेळघाटात कुपोषणाने अर्भके, गर्भवती आणि स्तनदा मातांचे मृत्यू होत असताना या समस्येवर उपाय करण्याबाबत सरकार ठोस प्रयत्न करीत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मृत्यूची मूळ कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याची सूचनाही न्यायालयाने सरकारला केली.

समस्या अनेक आहेत. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती आणि निर्धार असायलाच हवा, अशी टिप्पणी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने केली. मेळघाटात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. 

कुपोषणामुळे अर्भके, गर्भवती महिला आणि स्तनदा माता असे ११५ हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती उजेडात आल्यानंतर न्यायालयाने, ‘आपल्याला तीव्र धक्का बसला आहे’, असे नमूद केले. तथापि,  सर्व मृत्यू केवळ कुपोषणामुळे नाही तर त्यामागे अन्य कारणे आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. मेळघाटात बहुसंख्य मुलींचे लग्न वयाच्या १३ व्या वर्षी होते आणि त्यानंतर लगेचच त्या गर्भवती राहतात. अनेकदा अकाली प्रसूती होते. त्यातूनच वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होते, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

बाल मृत्यूच्या समस्येवर मात कशी करणार ते सांगा: कोर्ट

गेल्या दोन-तीन दशकांपासून हे मृत्यू होत आहेत. सामान्य कारणांमुळे असे मृत्यू होऊ नयेत, यासाठी सरकारने ‘शून्य सहनशीलते’चा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार कोणती कार्ययोजना  आखणार आहे, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, त्या भागांतील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही न्यायालयाने सरकारला केले.

आरोग्य केंद्रे बळकट करा

प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करण्यासाठी पावले उचलावीत आणि नव्याने पदवीधर झालेल्या डॉक्टरांसोबतच अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ तेथे सेवा देतील, याची काटेकोर दक्षता घ्यावी, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने केली. त्यावर, ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना राबवून मूलभूत वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही न्यायालयाने सरकारला सुचविले.

English
हिंदी सारांश
Web Title : High Court upset over Melghat malnutrition deaths; suggests zero tolerance.

Web Summary : Bombay High Court expressed displeasure over the Maharashtra government's handling of malnutrition deaths in Melghat. The court urged a 'zero tolerance' policy, emphasizing investigation into root causes and strengthening healthcare facilities with specialists to prevent further fatalities among infants and mothers.
टॅग्स :MelghatमेळघाटMumbai High Courtमुंबई हायकोर्ट