शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी गाव सोडले; पण मोबाईलने घरी आणले

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

त्या दोघांची चित्तरकथा : घरातून गायब झालेल्या अंतवडीच्या मुलांना रांजणगावातून पोलिसांनी घेतले ताब्यात

जगन्नाथ कुंभार -मसूर -दोन अल्पवयीन मुलांनी पळून जाण्यासाठी घर सोडले. मात्र, त्यांचे नशीब फुटले. या काळात त्यांचा मोबाईल हरविला, तळीरामांनी पैसे घेऊन पोबारा केला, ही चित्तरकथा आहे अंतवडी, ता. कऱ्हाड येथील गायब झालेल्या मुलांची. मुलांच्या गायब होण्याने पालक अन् पोलीसही चक्रावले होते. सरतेशेवटी रांजणगाव, जि. अहमदनगर येथून त्यांना ताब्यात घेतले.  याबाबत अधिक माहिती अशी की, अंतवडी येथील ॠत्विक (वय १५) व नीरज (१५) ही दोन्ही मुले घरात कुणालाही न सांगता अचानक गायब झाली होती. त्यामुळे पालकांनी शोधाशोध करूनही सापडली नाहीत. त्यांनी मसूर पोलीस ठाण्यात ‘आमच्या मुलांना कोणी तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे,’ अशी तक्रार दाखल केली. याचे गांभीर्य ओळखून उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांचे एक पथक व सहायक फौजदार प्रकाश कोकाटे यांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी तयार केले. पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस नाईक सुधाकर भोसले, सुनील शेलार यांच्या पथकाने मुलांच्या घरी संपर्क साधून प्राथमिक तपास केला असता. नीरजने घरातील दुधाचे अडीच हजार रुपये व मोबाइल गायब झाल्याचे समजले. ॠ त्विक हाही त्याच्याबरोबर गेला आहे; परंतु त्याच्याकडे काही पैसे नाहीत, असे सांगण्यात आले. त्या मुलांनी रांजणगाव येथून केलेल्या मोबाईलच्या आधारेच तपासकामी मदत होऊन मुले आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, ती दोन्ही मुले काहीही न झाल्याच्या आर्विभावात म्हणाले, ‘ आम्ही २५ जानेवारीला अंतवडी सोडून जाण्याचा बेत आखला होता.  त्यानुसार नेमके कुठे जायचे, हे ठरवले नव्हते. त्यानुसार २६ जानेवारीला सकाळी अकरा वाजता कपडे मोबाइल व पैसे घेऊन कऱ्हाड रेल्वेस्थानक गाठले. दुपारी साडेतीनला पुण्याकडे जाणारी रेल्वे आली आणि त्यामध्ये बसून आम्ही पुणे गाठले. पुणे रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. तेथे मोबाईल चोरीला गेला.  पहाटे त्यांना दोन तळीरामांनी गाठले. ‘तुम्हाला काम पाहीजे का?,’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘हो’ म्हणून सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रांजणगावला जाणाऱ्या रेल्वेत बसले. रेल्वेतूनच यांनी त्या तळीरामांचा मोबाइल घेऊन ‘आम्ही नगरला आहोत, आमचा शोध घेऊ नका,’ असा फोन केला. तळीरामांनी रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत नेले. तेथे रात्र झाल्यावर ती रात्र एका खोलीत काढली. सकाळी तळीरामांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी तीनशे रुपये दिले. हे पैसे घेऊन तळीराम पसार झाले. आपण फसलो आहोत, हे लक्षात आले व ते दोघेही तेथून पळून तडक रस्त्यावर आले. तोपर्यंत इकडे पालकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मुलांनी पालकांना केलेल्या फोनचा आधार घेत पोलिसांनी तपास केला असता. मुले रांजणगाव येथे आढळून आली. मुलांच्या फोनमुळे तपासाला गती -अल्पवयीन मुले होती. त्यांचा फोन चोरीला गेला. तरीही त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला. या फोनचे लोकेशन सुरुवातीस अहमदनगर दाखवत होते. त्यादृष्टीने तपास करत असतानाच दुसऱ्यांदा त्यांनी केलेल्या फोनचे लोकेशन रांजणगाव दिसून आले. त्यामुळे रांजणगाव पोलिसांची मदती घेऊन मुलांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले,’ असे मत पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांनी व्यक्त केले.