शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुगाच्या राशी झाल्या; भाव घसरले... हमीभाव अजूनही अधांतरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 3:25 PM

हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात अजूनही हमीभाव अधांतरी आहे.

- धर्मराज हल्लाळे

हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात अजूनही हमीभाव अधांतरी आहे. सध्या मुगाच्या राशी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. परंतु हमीभावापेक्षा क्विंटलमागे 2000 रुपये कमी दरानेच विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच राहिल्या आहेत.

मुगाला 6975 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु हमीभावाने खरेदी करणारे केंद्रच अस्तित्वात नाहीत. लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी बाजार समिती आहे. दररोज सुमारे 10 हजार क्विंटलपेक्षा अधिक मूग बाजारात विक्रीसाठी येत आहे. परंतु हमीभाव केंद्रच सुरू झालेले नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यापूर्वी शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एकट्या लातूरच्या बाजार समितीत 28 कोटींपेक्षा उलाढाल ठप्प झाली होती. व्यापाऱ्यांना हमीभावाने खरेदी करणे परवडत नाही अन् त्यांनी तसे नाही केले तर कारवाई होणार या धास्तीने व्यवहारच बंद होता. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. त्यामुळे ते पुन्हा कर्जबाजारी होतील, अशी स्थिती आहे. व्यापाऱ्यांकडून उसनवारी वाढली आहे. एकंदर हमीभाव केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. अन्यथा कमी दराने का होईना, शेतमाल विकणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे राहिला आहे. 

सध्याच्या कायद्यामध्ये कारवाईची तरतूद नसल्याचे राज्याच्या पणन संचालकांनी कळविल्यानंतर बाजार सुरू झाला. मुगाची आवक वाढली. मात्र भाव घसरला. जिथे हमीभाव 6900 आहे तिथे शेतकऱ्यांच्या पदरी 4800 रुपये मिळत आहे. शासनाच्या प्रस्तावित निर्णयामुळे 11 दिवस बंद राहिलेला बाजार त्यानंतर बाजारात झालेली घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. अजून उडीद, सोयाबीन यायचे आहे. त्यांच्याही हमीभावाचे आकडे शासकीय दफ्तरीच राहतील की काय, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाफेडच्या अधिकाऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु एकही केंद्र सुरू झालेले नाही. शेतकऱ्यांचा बैलपोळा उसनवारीवर झाला. येणाऱ्या महिनाभरातील सणही हमीभावाची प्रतीक्षा करण्यात जाऊ नये यासाठी गरज असलेला शेतकरी मिळेल त्या भावाने शेतमाल विक्री करीत आहे. एकीकडे शासन दुप्पट उत्पन्नाच्या जवळही शेतकऱ्यांना घेऊन जाऊ शकले नाही. उलट हक्काचा हमीभावही मिळू शकत नाही. पावसाने दिलेल्या ताणामुळे शेतकरी कायम चिंतेत आहे. एकतर पिकतच नाही अशी स्थिती, पिकले तर घसरलेला भाव माथी मारला जातो. अशा विचित्र कोंडीतून शेतकऱ्यांची काही केल्या सुटका होत नाही. निदान शासनाने तातडीने हालचाली करून हमीभाव केंद्र उभारले तर बळीराजाला काही अंशी न्याय मिळेल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र