सरकारने वाढविले कर्जमाफीचे जिल्ह्यातील ३१ हजार लाभार्थी

By Admin | Updated: July 5, 2017 01:04 IST2017-07-05T01:04:24+5:302017-07-05T01:04:24+5:30

कृषी कर्जमाफी; एप्रिल २०१२ पूर्वीच्या थकबाकीदारांची मागविली माहिती

The government increased the debt waiver amounting to 31 thousand beneficiaries in the district | सरकारने वाढविले कर्जमाफीचे जिल्ह्यातील ३१ हजार लाभार्थी

सरकारने वाढविले कर्जमाफीचे जिल्ह्यातील ३१ हजार लाभार्थी

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी कर्जमाफीचे लाभार्थी ३१ हजारने वाढविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पहाटे टिष्ट्वट करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हजार ९४४ शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
प्रत्यक्षात सहकार विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या जिल्ह्यातील ४९ हजार ९३७ शेतकऱ्यांचाच सात-बारा कोरा होऊ शकतो. ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यासह ३५ जिल्ह्यांतील किती (पान १२ वर)

कर्मचारी वैतागले
गेले महिन्याभरात सहकार विभागाकडून थकबाकीदार, प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर माहितीच्या संकलनाचे काम सुरू आहे. आता एप्रिल २०१२ पूर्वीची माहिती मागविली आहे. सहकार विभाग बॅँकेकडे माहिती मागतो, बॅँक विकास संस्थांकडे माहिती मागते. त्यात ही सगळी माहिती तातडीने द्यायची असल्याने तिन्ही स्तरांवरील कर्मचारी अक्षरश: वैतागले आहेत.

Web Title: The government increased the debt waiver amounting to 31 thousand beneficiaries in the district