शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

मंत्रालयात जाळी बसवून सरकारने केली शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा - रघुनाथदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 8:39 PM

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मंत्रालयाला जाळी बसवून मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. ही शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा आहे, अशी टीका...

 सांगली  - शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मंत्रालयाला जाळी बसवून मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. ही शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी आंदोलनापुढे मुख्यमंत्र्यांना झुकावे लागले. त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन बरीच आश्वासने दिली, मात्र त्यातील एकाचेही पालन त्यांनी केले नाही. परिणामी वर्षभर शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच राहिले. धर्मा पाटील यांना मंत्रालयासमोर आत्महत्या करावी लागली. अशावेळी संबंधित शेतकºयांच्या प्रश्नावर उपाय शोधण्याऐवजी मंत्रालयासमोर कुणी आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा उपाय शोधला. इतका वेडेपणा दर्शविणारा मुख्यमंत्री आम्ही आजवर पाहिला नाही. शेतकºयांच्या आत्महत्येची ही कुचेष्टा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव कर्पे-पाटील ते धर्मा पाटील आदींसह विविध आंदोलनांमध्ये हौतात्म्य आलेल्या शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी सुकाणू समितीसह शेतकºयांकडून १९ मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नादात्यांच्या हक्कासाठी एक दिवस अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्मे, हैदराबाद-गोवामुक्ती संग्रामातील हुतात्मे, शेतकरी आंदोलनामधील हुतात्मे, पवना धरणग्रस्त हुतात्मे आदींना अभिवादन करण्यात येणार आहे. वर्षभर शांतता बाळगल्यानंतर आता पुन्हा सुकाणू समितीमार्फत शेतकºयांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. आता मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आम्हाला नको, निर्णयांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित शिंदे म्हणाले की, जिल्हा सुधार समितीसुद्धा शेतकरी संघटनांच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहे. सांगलीत १६ रोजी बैठकसांगलीत येत्या १६ फेब्रुवारीस मार्केट यार्डातील वसंतदादा शेतकरी भवनात सुकाणू समितीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शेतकºयांच्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसाठी शेरमुख्यमंत्र्यांना उद्देशून रघुनाथदादांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत एक शेर सादर केला. मुहाओजोंसे नही रुकती मौत, वो दरवाजे बंद कर दो, जहॉँ से आती है मौत! सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी या शेरचा विचार धोरण ठरविताना करावा, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार