शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

शालाबाह्य विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष;राज्यात पाच लाख शालाबाह्य मुले असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:40 IST

शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या जबाबदारीचा शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना विसर

ठळक मुद्देकामगारांच्या मुलांचे नीटपणे ‘टॅपिंग’केले तर या शालाबाह्य मुलांचा प्रश्न सुटू शकेलशिक्षण हक्क कायद्यात नमूद केलेल्या शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष पुणे, सातारा,कोल्हापूर, सोलापूर व नाशिक जिल्ह्यात ७३ हजार खाण कामगारांची मुले शालाबाह्य

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शालाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न योग्यपणे हाताळला गेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शालाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी राज्य शासनाने मोहिम हाती राबविली पाहिजे. तेव्हाच रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या , बांधकामाच्या किंवा विट भट्टीच्या ठिकाणी आणि ऊस तोडणी कामगारांबरोबर फिरणाऱ्या मुलां-मुलींसाठी शाळेची दारे उघडतील, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.  राज्यातील शाळांची गुणवत्तावाढीची मोठी मोहिम हाती घेतली. लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या जबाबदारीचा शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना विसर झाला आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून शालाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्याबाबत सध्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बेरोजगारीमुळे परराज्यातील अनेक कुटुंब पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या प्रश्नाकडे गांभिर्यांने पाहिले जात नाही. त्यामुळेच शहरातील विविध रस्त्यांवर लहान मुले आपल्या पालकांबरोबर वस्तू विकताना दिसतात. इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आई-वडिलांना मदत करताना अढळून येतात.  माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शालाबाह्य मुलांच्या बाबत घेतलेल्या निर्णयावर टीका झाली. शालाबाह्य विद्यार्थी ही सामाजिक सामाजिक समस्या असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळेच संतुलन संस्थेचे संस्थापक व दगड खाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे बस्तु रेगे, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, महाराष्ट्र शिक्षण हक्क मंचच्या निमंत्रक हेमांगी जोशी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी शालाबाह्य मुला-मुलींच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभिर्याने पहावे, अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  --ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगारांच्या मुलांचे नीटपणे ‘टॅपिंग’केले तर या शालाबाह्य मुलांचा प्रश्न सुटू शकेल. राज्यात सध्या सुमारे पाच लाख शालाबाह्य मुले असणाची शक्यता आहे. सध्याचे सरकार स्वत:ला वंचित, उपेक्षितांची बांधिलकी सांगत असेल तर शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शासनाने विशेष मोहिम हाती घेतली पाहिजे.  - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ  -सध्या शासन ‘न नापास’धोरणाचा फेरविचार करणारे आहे. विद्यार्थी नापास होत असेल तर शिक्षण व्यवस्थेत उणीवा असण्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने या उणिवा दूर केल्या पाहिजेत. न नापास धोरणाचा फेरविचार झाल्यास पाचवीनंतर विद्यार्थी नापास होतील. त्यामुळे शालाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न अधिक गंभीर होईल.  ...........शिक्षण हक्क कायद्यात नमूद केलेल्या शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचे धोरण स्वीकारले तर आरटीईमधील नियमाच्या विसंगत कृती होईल. आरटीईनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार वर्गात प्रवेश देणे गरजेचे आहे. शालाबाह्य मुलांचा प्रश्न एकट्या शासनाने नाही तर समाजातील सर्व घटकांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.- वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ----शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले. शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सुध्दा ही चूक करू नये. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व नाशिक जिल्ह्यात सुमारे ७३ हजार दगडखाण कामगारांची मुले शालाबाह्य आहेत. या मुलांसह इतरही मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.- बस्तू रेगे, संस्थापक, संतुलन

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाState Governmentराज्य सरकार