शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

‘मराठा आरक्षणाचा सरकारचा निर्णय न्यायपूर्ण’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:32 AM

मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही.

मुंबई - मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायपूर्ण आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणारे याचिकाकर्ते दिलीप पाटील यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला.गायकवाड समितीने मराठवाड्याचा जास्त अभ्यास केला आहे. कारण या भागात मराठा समाजातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. येथील समस्या गंभीर आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. येथेच रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध आहेत आणि हाच भाग जास्त मागास आहे. समितीने तज्ज्ञ संस्थांना मराठा समाजाचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यामुळे समितीकडे असलेली माहिती ही कोणाकडून मागविलेली नाही, तर प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करून संकलित करण्यात आली आहे, असा युक्तिवाद दिलीप पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला.एखाद्या समाजाची एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत शिकते आणि राजकीय ताकद मिळवते म्हणून तो समाज मोठा होत नाही. याचे उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे, असा युक्तिवाद ढाकेफाळकर यांनी केला. समितीने ४८ पेक्षा अधिक निकष लावून मराठा समाज मागास आहे की नाही, याचा अभ्यास केला. त्यानंतरच मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला आणि याच समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारचा हा निर्णय न्यायपूर्ण आहे, असे ढाकेफाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMaratha Reservationमराठा आरक्षण