शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण!

By admin | Updated: March 17, 2015 01:11 IST

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे.

उस्मानाबाद : अनागोंदी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे. राज्यातील पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर या मंदिरांप्रमाणे तुळजा भवानी मंदिराचाही कारभार आता राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार निजाम राजवटीने १९०९ पासून घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत या नियमावलीनुसार सुरू होता. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंद धमार्दाय न्यासाकडे असली तरी मंदिरातील सर्व व्यवहार या कवायतीत नमूद केल्याप्रमाणेच सुरू होते. मंदिरातील पुजाऱ्यांचे हक्क, विविध विधी, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी आणि रोख रकमेत असलेले पारंपारिक हक्क तसेच त्याचा विनियोग आदींबाबतचे निर्णय या नियमावलीनुसार घेण्यात येत होते. तुळजाभवानी मंदिर संस्थान चॅरिटेबल अ‍ॅक्ट नुसार नोंदणीकृत संस्था असून, त्यावर जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पूर्वीपासून काम पाहत आहेत. दरम्यानच्या काळात मंदिरात झालेली अनागोंदी आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिराचा कारभार पारदर्शक होण्यासाठी त्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असण्याची गरज व्यक्त करीत २०१० मध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानचा समावेश राजपत्रात करावा, असा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये अनेक अडथळे पार करीत या संबंधी प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली होती. अखेर मंदिर संस्थानची राज्य शासनाने नोंद घेत २० फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुजारी मंडळांकडूनही स्वागत : मंदिरात मागील २० वर्षांत झालेले आर्थिक गैरव्यवहार पाहता राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यापुढील काळात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीचा सामाजिक उपक्रमांसाठी योग्य वापर होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांसाठी लवकरच नियमावली : राज्य शासनाने तुळजाभवानी मंदिरासंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारकडे नोंद असलेल्या सर्व मंदिर संस्थानसाठी लवकरच एकच नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसमोर झाले होते सादरीकरण : राज्य शासनाने अंतिम अधिसूचना जारी केल्याने मंदिर संस्थानचा कारभार अधिक पारदर्शक तसेच गतीशील करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केली.