शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

राज्य सरकारच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियमावलीचे गोरेगाव प्रवासी संघाने केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:47 IST

Ganeshotsav In Maharashtra : अतिशय योग्य नियमावली केल्याचं सांगत गोरेगाव प्रवासी संघाच्या अध्यक्षांकडून स्वागत. गणेशोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केली होती नियमावली.

ठळक मुद्देअतिशय योग्य नियमावली केल्याचं सांगत गोरेगाव प्रवासी संघाच्या अध्यक्षांकडून स्वागत. गणेशोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केली होती नियमावली.

मुंबई : गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन आणण्याचा निर्णय अनेक वर्षे प्रलंबित राहीला होता. तो अंमलात आणण्याचा चांगला निर्णय लागू करणे अत्यावश्यक होता. डॉ. शुभा राऊळ या महापौर असताना त्यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. परंतु सार्वजनिक उत्सव मंडळांच्या दबावाखाली हा निर्णय उपेक्षितच राहीला. राज्य सरकारने आगामी गणेशोत्सवासाठी अतिशय योग्य अशी नियमावली नुकतीच जाहीर केली. त्याबद्दल राज्य सरकारचे गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी अभिनंदन केले आहे.

सरकारच्या या निर्णयाचे पालन करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांवर घातल्याने माझे सरकार माझे कार्यकर्ते या संकल्पनेतून नियमांची मोडतोड करण्याचा प्रकार त्या निमित्ताने टळेल असा विश्वास चितळे यांनी व्यक्त केला. "राज्य सरकारने या विषयी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वातंत्र्य न दिल्याने मुंबईत ४ फूट आणि ठाण्यात व पुण्यात २४ फूट असा प्रकार होणार नाही. सरकारच्या या नियमावलीने पर्यावरण प्रेमी सामान्य नागरिक सुखावला आहे. उंच गणेश मूर्ती बनवून काही हजार टन पीओपी समुद्रात ढकलणे हे निषेधार्ह आहे. आता सरकारच्या या निर्णयाला विरोध करत राजकारण करण्याचा प्रकार  सुरू केला आहे. गणेश मंडळांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे व उदर निर्वाहाचा प्रश्न मांडला आहे. गणेशोत्सव मंडळांना मूर्तिकारांकडून चार फुटी शाडूच्या मूर्ती घेऊन मूर्तीच्या किंमतीच्या अनेकपट रक्कम मानधन म्हणून मुर्तिकारांना देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत करायला काय हरकत आहे?," असा सवाल चितळे यांनी व्यक्त केला.

"कोरोनाच्या निमित्ताने समुद्रात अनेक गोष्टींचे विसर्जनावर बंदी असल्याने समुद्राचे पाणी व समुद्र किनारे मोठ्या प्रमाणात स्वच्छ झालेले दिसतात. हे सर्व ध्यानात घेत राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीवर असलेले बंधन कायम ठेवावे, तसेच  गणेश मूर्तीच्या देखाव्यावर व सोबतच्या अन्य मूर्तीवर हे बंधन ठेवावे. एकंदरीत राज्य सरकारने भावनिक आवाहनाना कचऱ्याची टोपली दाखवावी व भडकाऊ भाषणे करणाऱ्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवावी," असे मत उदय चितळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस