शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 16:33 IST

गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे...

पुणे : गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे. तसेच आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीत देखील नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच भाजप व मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेनेकडून देखील भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औंरंगाबाद शहराच्या संभाजीनगर या नामांतरावरून मोठं विधान केले आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील विकास कामांविषयीचर्चा केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळेच औरंगाबादकरांनो,महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पहिल्याच सभेत संभाजीनगर नामांतराचा ठराव मंजूर करून दाखवतो, असे मोठे विधान पाटील यांनी यावेळी केले आहे. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर पण... मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात. त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस