शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 16:33 IST

गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे...

पुणे : गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे. तसेच आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीत देखील नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच भाजप व मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेनेकडून देखील भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औंरंगाबाद शहराच्या संभाजीनगर या नामांतरावरून मोठं विधान केले आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील विकास कामांविषयीचर्चा केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळेच औरंगाबादकरांनो,महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पहिल्याच सभेत संभाजीनगर नामांतराचा ठराव मंजूर करून दाखवतो, असे मोठे विधान पाटील यांनी यावेळी केले आहे. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर पण... मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात. त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस